शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

माेबाइलमुळे झाली ‘मेमरी लाॅस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : मोबाइलचा वापर सर्वच गोष्टींसाठी होत असल्याने, आता फोन करतानाही नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे न्युमरिकल ...

रत्नागिरी : मोबाइलचा वापर सर्वच गोष्टींसाठी होत असल्याने, आता फोन करतानाही नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे न्युमरिकल मेमरीचा वापर थांबला आहे. मात्र, जे अद्याप मोबाइल वापरत नाहीत, अशा ज्येष्ठ व्यक्ती किंवा मुले यांना फोन नंबर्स लक्षात ठेवणे सोपे झाले आहे. त्यामुळे मोबाइलमुळे मेमरीवर परिणाम झाला आहे, असेच म्हणायला हवे.

असे का हाेते?

मोबाइलमध्ये सगळ्याच गोष्टी एका क्लिकवर मिळतात. त्यामुळे लहानशा संख्यात्मक गोष्टींसाठी आपण मेंदूला ताण न देता, मोबाइलचा वापर करतो.

सध्या प्रत्येकाचाच संपर्क वाढल्याने फोननंबरही वाढले आहेत. कामाचा व्याप वाढल्याने नंबर लक्षात ठेवणे अशक्य झाले आहे. मोबाइल क्रमांक दहा आकडी असेल, तरी ते मोबाइलमध्ये सहजगत्या सेव्ह असल्याने आपणाला ते रेडिमेड मिळतात.

हे टाळण्यासाठी ...

n मोबाइल क्रमांक लक्षात ठेवायला हवेत, ते आठवायला हवेत, अशी इच्च्छाशक्ती असायला हवी.

n शाळेतील पाढे विसरून दोनअंकी बेरीज - वजाबाकीसाठी मोबाइलवर अवलंबून राहत आहोत.

n ही सवय जाण्यासाठी मोबाइलऐवजी स्वत:च्या मेंदूला ताण देऊन प्रक्रिया कराव्यात.

n फोननंबर लक्षात ठेवण्यासाठी ठरावीक ट्रिक वापरण्याचा प्रयत्न सातत्याने करावा.

मुलांना, आजाेबांना नंबर्स पाठ कारण...

आजोबा

जनार्दन साळवी हे आजोबा म्हणतात, त्यांच्या काळी पाठांतर असल्याने ती सवय पुढेही कायम राहिली. त्यामुळे आता मुलांचे किंवा नातेवाइकांचे फोननंबर अजूनही लक्षात आहेत. आता माझ्याकडे साधा मोबाइल आहे, परंतु तरीही सगळ्यांचे नंबर तोंडपाठ आहेत.

वडील

विद्याधर साळवी म्हणतात, कामाच्या स्वरूपामुळे हजारो लोकांचे मोबाइल नंबर सेव्ह करून ठेवावे लागतात. सध्या धकाधकीच्या काळात काय काय लक्षात ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी मोबाइल मदतीला धावतो. एखादा नंबर आठवायचा म्हटलं तरी शक्य होत नाही.

मुलगी

सातवीत असलेली रुचा साळवी म्हणते, माझ्याकडे मोबाइल नसला, तरी मला माझ्या आई-बाबांचा, दादाचा मोबाइल नंबर तोंडपाठ आहे. मी हे नंबर पाठच करून ठेवले आहेत. त्यामुळे कधी कुणाला सांगायचे झाले, तर मला ते पटकन आठवतात. काही वेळा लिहून ठेवले की लक्षात राहतात.

पूर्वी शाळेत असताना पाढे संपूर्ण पाठ करावे लागायचे. त्यामुळे गणितातील चार प्रमुख क्रिया स्वत: चटकन करता येत असत. आता मोबाइलवर कॅलक्युलेटर आला. त्यामुळे त्याचा वापर वाढला. हजारो फोन नंबरही मोबाइलवर सेव्ह होत असल्याने, फोन करण्यासाठी केवळ नंबर डायल करावा लागतो. नंबर आठवण्यासाठी आपण मेंदूला ताणही देत नाही. आपण आपली मेमरी न वापरता नेहमी मोबाइलचीच वापरतो. त्यामुळे आपल्या मेमरीचा ऱ्हास होत आहे. मात्र, आपण तो लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्या, तर हे शक्य आहे. मात्र, त्यातही सातत्य हवे.

- डाॅ.अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.