शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

माेबाइलमुळे झाली ‘मेमरी लाॅस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : मोबाइलचा वापर सर्वच गोष्टींसाठी होत असल्याने, आता फोन करतानाही नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे न्युमरिकल ...

रत्नागिरी : मोबाइलचा वापर सर्वच गोष्टींसाठी होत असल्याने, आता फोन करतानाही नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे न्युमरिकल मेमरीचा वापर थांबला आहे. मात्र, जे अद्याप मोबाइल वापरत नाहीत, अशा ज्येष्ठ व्यक्ती किंवा मुले यांना फोन नंबर्स लक्षात ठेवणे सोपे झाले आहे. त्यामुळे मोबाइलमुळे मेमरीवर परिणाम झाला आहे, असेच म्हणायला हवे.

असे का हाेते?

मोबाइलमध्ये सगळ्याच गोष्टी एका क्लिकवर मिळतात. त्यामुळे लहानशा संख्यात्मक गोष्टींसाठी आपण मेंदूला ताण न देता, मोबाइलचा वापर करतो.

सध्या प्रत्येकाचाच संपर्क वाढल्याने फोननंबरही वाढले आहेत. कामाचा व्याप वाढल्याने नंबर लक्षात ठेवणे अशक्य झाले आहे. मोबाइल क्रमांक दहा आकडी असेल, तरी ते मोबाइलमध्ये सहजगत्या सेव्ह असल्याने आपणाला ते रेडिमेड मिळतात.

हे टाळण्यासाठी ...

n मोबाइल क्रमांक लक्षात ठेवायला हवेत, ते आठवायला हवेत, अशी इच्च्छाशक्ती असायला हवी.

n शाळेतील पाढे विसरून दोनअंकी बेरीज - वजाबाकीसाठी मोबाइलवर अवलंबून राहत आहोत.

n ही सवय जाण्यासाठी मोबाइलऐवजी स्वत:च्या मेंदूला ताण देऊन प्रक्रिया कराव्यात.

n फोननंबर लक्षात ठेवण्यासाठी ठरावीक ट्रिक वापरण्याचा प्रयत्न सातत्याने करावा.

मुलांना, आजाेबांना नंबर्स पाठ कारण...

आजोबा

जनार्दन साळवी हे आजोबा म्हणतात, त्यांच्या काळी पाठांतर असल्याने ती सवय पुढेही कायम राहिली. त्यामुळे आता मुलांचे किंवा नातेवाइकांचे फोननंबर अजूनही लक्षात आहेत. आता माझ्याकडे साधा मोबाइल आहे, परंतु तरीही सगळ्यांचे नंबर तोंडपाठ आहेत.

वडील

विद्याधर साळवी म्हणतात, कामाच्या स्वरूपामुळे हजारो लोकांचे मोबाइल नंबर सेव्ह करून ठेवावे लागतात. सध्या धकाधकीच्या काळात काय काय लक्षात ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी मोबाइल मदतीला धावतो. एखादा नंबर आठवायचा म्हटलं तरी शक्य होत नाही.

मुलगी

सातवीत असलेली रुचा साळवी म्हणते, माझ्याकडे मोबाइल नसला, तरी मला माझ्या आई-बाबांचा, दादाचा मोबाइल नंबर तोंडपाठ आहे. मी हे नंबर पाठच करून ठेवले आहेत. त्यामुळे कधी कुणाला सांगायचे झाले, तर मला ते पटकन आठवतात. काही वेळा लिहून ठेवले की लक्षात राहतात.

पूर्वी शाळेत असताना पाढे संपूर्ण पाठ करावे लागायचे. त्यामुळे गणितातील चार प्रमुख क्रिया स्वत: चटकन करता येत असत. आता मोबाइलवर कॅलक्युलेटर आला. त्यामुळे त्याचा वापर वाढला. हजारो फोन नंबरही मोबाइलवर सेव्ह होत असल्याने, फोन करण्यासाठी केवळ नंबर डायल करावा लागतो. नंबर आठवण्यासाठी आपण मेंदूला ताणही देत नाही. आपण आपली मेमरी न वापरता नेहमी मोबाइलचीच वापरतो. त्यामुळे आपल्या मेमरीचा ऱ्हास होत आहे. मात्र, आपण तो लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्या, तर हे शक्य आहे. मात्र, त्यातही सातत्य हवे.

- डाॅ.अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.