शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

एस.टी.तील आमदार आरक्षण नावालाच, वापर शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या सीट आमदारांसाठी आरक्षित असतात. ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या सीट आमदारांसाठी आरक्षित असतात. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षांत याचा वापर जिल्ह्यातील एकाही आमदारांनी केलेला नाही. कित्येक वर्षात आपण एस.टी.तच बसलो नसल्याचे आमदारांनी सांगितले. मात्र, त्यांच्या कार्यक्षेत्रासह मंत्रालयात जाण्यासाठी स्वत:च्या वाहनांचा वापर करीत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात रेल्वे व खासगी वाहतूक सुरू झाल्यापासून एस.टी.तील प्रवाशांचा ओढा कमी झाला आहे. रेल्वे व खासगी वाहतूक सुरू होण्यापूर्वी गर्दीच्या हंगामात आरक्षण उपलब्ध होत नसे, त्यामुळे प्रवासी आमदारांची चिठ्ठी आणून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत असत; परंतु आता एस.टी.चे आरक्षण ऑनलाइन उपलब्ध असून उपलब्धताही सहज होत आहे. त्यामुळे आमदारांच्या आरक्षित सीटवर बसून सर्वसामान्य व्यक्तीच प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कित्येक वर्षांत एस.टी.तच बसलो नाही

कित्येक वर्षांत एस.टी.तच बसलो नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.त आमदारांसाठी दोन सीटचे आरक्षण सुरुवातीपासून आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत आपण एस.टी.तच बसलेलो नाही. शिवाय या आरक्षणाचा लाभही घेतलेला नाही. स्वत:चे वाहन असल्याने विधानसभा कार्यक्षेत्र असो वा जिल्ह्यात अन्यत्र जायचे असल्यास किंवा मुंबईला बैठकांसाठी जाण्या-येण्यासाठी स्वत:च्या वाहनाचाच वापर करीत आहे. एस.टी.कडून आमच्यासाठी सन्मानाने सीटचे आरक्षण ठेवण्यात येत आहे. मात्र, याचा वापर कुठल्याच आमदारांकडून होत नाही.

- भास्कर जाधव, आमदार,

गुहागर विधानसभा मतदारसंघ

विद्यार्थीदशेत असताना एस.टी.तून काही वेळा प्रवास केला आहे. मात्र त्यानंतर एस.टी.ने प्रवास करण्याची वेळच आली नाही. आमदारांसाठी एक व दोन क्रमांकाच्या सीटचे आरक्षण असले तरी त्याचा वापर कुणीच करत नाहीत. सुरुवातीला एस.टी.चे आरक्षण उपलब्ध होत नसे त्यावेळी आमदारांच्या चिठ्ठीचा वापर करून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न प्रवाशांकडून होत असे. मात्र, आता तोही प्रकार कालबाह्य झाला आहे. आरक्षण असले तरी सर्वसामान्य प्रवाशांनाच याचा लाभ होत आहे.

-शेखर निकम, आमदार, चिपळूण विधानसभा मतदारसंघ

चारचाकीत फिरणाऱ्यांना

कशाला हवी सवलत

महामंडळाने आमदारांसाठी दोन सीटचे आरक्षण ठेवले आहे. मात्र, आता काळ बदलला आहे. ते स्वत:च्या वाहनातून प्रवास करीत असल्यामुळे एस.टी.तून प्रवास करण्याचा प्रश्नच येत नाही. परिस्थिती बदलाचा स्वीकार करीत आता आरक्षणाच्या नियमात महामंडळाने बदल करण्यास हरकत नाही. नावालाच या सीट आरक्षित असतात.

- राजन जाधव, रत्नागिरी

गर्दीच्या हंगामात एस.टी.त चढताना वाहक ज्या सीटचे आरक्षण आहे, त्याचे क्रमांक सांगतात. त्याचप्रमाणे प्रथम दोन सीट सोडून बसण्याची सूचना करतात. दोन सीट आमदारांसाठी राखीव असल्याचे सर्वांनाच अभिप्रेत आहे; परंतु जर आमदारांकडून त्याचा वापर होत नसेल तर ते आरक्षण आता बदलण्यास हरकत नाही. वास्तविक सामान्य जनता या सीटवर बसून प्रवास करीत आहेत. त्यामुळे नियमातील बदल गरजेचे आहेत.

- शुभदा जोशी, देवरूख