शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मिरजोळे-मधलीवाडीत भूस्खलन धोका वाढला

By admin | Updated: July 16, 2015 00:30 IST

शेतकरी चिंताग्रस्त : भेगांमधील दरी रुंदावली

रत्नागिरी : मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथे नदीने पात्र बदलल्याने गेल्या १५ वर्षांपासून भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे भूस्खलनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास गावातील विविध वाड्यांच्या शेतीला तसेच वाडकरवाडीतील घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मिरजोळे - मधलीवाडी येथे १५ वर्षांपासून नदीने पात्र बदलले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी भूस्खलन होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याकडे माहिती दिली असता, त्यांनी स्वत: याबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. या घटनेला आता वर्ष उलटून गेले तरीही यावरील उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यानंतरही पुन्हा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांच्या आदेशावरून पत्तन विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. मात्र, त्यांनी काय कारवाई केली, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या पाच - सहा वर्षांपासून केवळ पाहणी दौऱ्याशिवाय काही झालेले नाही. मात्र, ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने अद्याप कुठलीच उपाययोजना ठोसपणे राबवलेली नाही, असे मिरजोळे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मिरजोळे गावात दरवर्षी भूस्खलन होते. त्यामुळे या सर्व वाड्यांतील शेती वाया गेली असून, घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ गुरूनाथ भाटवडेकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिले आहे. सध्या होत असलेली ही धूप फक्त पिचिंग करून थांबवता येण्यासारखी आहे. शेती तसेच घरांना भूस्खलनापासून असलेला धोका लक्षात घेऊन या भागात पिचिंग करण्याकरिता संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)