शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

मिरजोळे-मधलीवाडीत भूस्खलन धोका वाढला

By admin | Updated: July 16, 2015 00:30 IST

शेतकरी चिंताग्रस्त : भेगांमधील दरी रुंदावली

रत्नागिरी : मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथे नदीने पात्र बदलल्याने गेल्या १५ वर्षांपासून भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे भूस्खलनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास गावातील विविध वाड्यांच्या शेतीला तसेच वाडकरवाडीतील घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मिरजोळे - मधलीवाडी येथे १५ वर्षांपासून नदीने पात्र बदलले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी भूस्खलन होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याकडे माहिती दिली असता, त्यांनी स्वत: याबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. या घटनेला आता वर्ष उलटून गेले तरीही यावरील उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यानंतरही पुन्हा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांच्या आदेशावरून पत्तन विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. मात्र, त्यांनी काय कारवाई केली, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या पाच - सहा वर्षांपासून केवळ पाहणी दौऱ्याशिवाय काही झालेले नाही. मात्र, ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने अद्याप कुठलीच उपाययोजना ठोसपणे राबवलेली नाही, असे मिरजोळे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मिरजोळे गावात दरवर्षी भूस्खलन होते. त्यामुळे या सर्व वाड्यांतील शेती वाया गेली असून, घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ गुरूनाथ भाटवडेकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिले आहे. सध्या होत असलेली ही धूप फक्त पिचिंग करून थांबवता येण्यासारखी आहे. शेती तसेच घरांना भूस्खलनापासून असलेला धोका लक्षात घेऊन या भागात पिचिंग करण्याकरिता संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)