शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

लाखोंचा अपहार, पुराव्याची जंत्री...

By admin | Updated: December 31, 2015 00:36 IST

नळपाणी योजना भ्रष्टाचार : मंडणगड तालुका प्रशासन अद्याप ढिम्मच

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील तुळशी ग्रामपंचायतीमार्फत आंबवणे खुर्द गावाला भारत निर्माण योजनेंतर्गत सन २००८ ते २०१० या कालावधीत नळपाणी योजना मंजूर झाली होती. मात्र, या नळपाणी योजनेमध्ये लाखो रूपयांचा अपहार झाल्याचा आरोप होत असून, माजी सरपंच रामचंद्र पारधी यांनी याबाबतचे पुरावे सादर करूनही प्रशासन ढिम्मच आहे.मंडणगड तालुक्यात सध्या नळपाणी योजनेतील भ्रष्टाचाराचा विषय चांगलाच गाजत आहे. या विषयात कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुळशी ग्रामपंचायतीमार्फत आंबवणे खुर्द गावच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाने ३६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. या योजनेसाठी कमिटीही बनवण्यात आली होती. मात्र, या कमिटीवरील सदस्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामाचा निधी काढण्याचे काम सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष यांनीच केले आहे. यामध्ये आयकर व विक्रीकरापोटी ६३ हजार ९४८ रुपये एवढे देणे असताना, २ लाख ६५ हजार एवढी रक्कम रोखीने काढली आहे. तसेच ४ लाख १० हजार रक्कमही रोखीने काढलेली आहे.विद्युत कामासाठी एस्टीमेंटमधे ३० हजार रूपयांची तरतूद असताना, ९६ हजार ५४० एवढी रक्कम रोखीने काढण्यात आली असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. कामासाठी देण्यात येणाऱ्या धनादेशांवरसुध्दा ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा सचिवांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र स्वत: कमिटीच्या सचिवांनी करून दिले आहे. कमिटी सचिव हे या योजनेच्या मंजुरीपासून आजपर्यंत मुंबई येथे वास्तव्यास आहेत. बनावट सह्या करून कामाचा निधी काढण्यात आला आहे. तुळशी सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत, भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या या कामामध्ये लाखो रूपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे पारधी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या निधीबद्दल लेखा परिक्षण अहवालामधे सूचना व शेरे मारण्यात आले आहेत़ तुळशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पारधी यांनी ही बाब पुराव्यासह प्रथम मार्च २०१४मध्ये गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणूनही, संबंधित कामाची किंवा झालेल्या कथित आरोपांची कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यात आलेली नाही़ त्यानंतर पारधी यांनी गटविकास अधिकारी यांना दोन स्मरणपत्रही दिली आहेत.़ मात्र, गटविकास अधिकारी या गैरव्यवहारकडे कानाडोळा करत असून, गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. या नळपाणी योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना चपराक बसावी, त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी सरपंच पारधी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)तक्रार अर्ज : सरपंच, अध्यक्षच जबाबदारकारवाई रखडलेलीचतुळशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामचंद्र गंगाराम पारधी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबतचे पुरावे सादर करूनही, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या अपहारामध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष हे जबाबदार असल्याचे पारधी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे़ सभासदांना माहितीच नाही...ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा कमिटी, सामाजिक लेखा परिक्षण कमिटी, महिला विकास कमिटी यावर असलेल्या सभासदांना कमिटीवर असल्याची कोणतीही कल्पना दिली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.