शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

लाखो नागरिक ‘जीवनदायी’विनाच

By admin | Updated: June 6, 2014 00:18 IST

रत्नागिरी जिल्हा : जीवघेण्या आजारावर मोफत उपचार मिळतायत कुठे?

गुहागर : गोरगरिबांचा मेडिक्लेम म्हणून ओळख असलेली केंद्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेलीच नाही. तब्बल ४ लाख ८ हजार कुटुंबांतील लोकांना जीवघेण्या आजारात विनामूल्य उपचार मिळू शकतात. मात्र जिल्ह्यात केवळ १ लाख १३ हजार लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.गरिबातील गरीब माणूस केवळ पैसे नाहीत म्हणून आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाची योजना लागू केली आहे. कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड रोपण आदी शेकडो आजारांमध्येच या योजनेतून नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळू शकते. या आजारांमध्ये लाखो रुपये खर्च येतो. गोरगरिबांना तो परवडत नाही. त्यामुळे शासनाने सरसकट प्रीमियम भरुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील सर्वांना या योजनेद्वारे आरोग्य विमा संरक्षण दिले आहे.या योजनेच्या रत्नागिरी व रायगड जिल्हा सहायक समन्वयक डॉ. प्रियांका कोंडे यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेस पात्र ४ लाख ८ हजार कुटूंब आहेत. आतापर्यंत १ हजार ६३५ लाभार्थींवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी ४ कोटी ६२ लाख ६२ हजार ६४४ रुपये खर्च आला. रत्नागिरी जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून लागू झाली आहे.रायगड जिल्ह्यात ही योजना २ जुलै २०१२ पासून लागू झाली आहे. येथे ५ लाख १९ हजार पात्र लाभार्थी कुटुंब असून, १२ हजार ३२७ लाभार्थ्यांवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी ३३ कोटी ८६ लाख ४७ हजार ७८९ रुपये खर्च आला. (प्रतिनिधी)