शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

लाखो नागरिक ‘जीवनदायी’विनाच

By admin | Updated: June 6, 2014 00:18 IST

रत्नागिरी जिल्हा : जीवघेण्या आजारावर मोफत उपचार मिळतायत कुठे?

गुहागर : गोरगरिबांचा मेडिक्लेम म्हणून ओळख असलेली केंद्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेलीच नाही. तब्बल ४ लाख ८ हजार कुटुंबांतील लोकांना जीवघेण्या आजारात विनामूल्य उपचार मिळू शकतात. मात्र जिल्ह्यात केवळ १ लाख १३ हजार लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.गरिबातील गरीब माणूस केवळ पैसे नाहीत म्हणून आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाची योजना लागू केली आहे. कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड रोपण आदी शेकडो आजारांमध्येच या योजनेतून नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळू शकते. या आजारांमध्ये लाखो रुपये खर्च येतो. गोरगरिबांना तो परवडत नाही. त्यामुळे शासनाने सरसकट प्रीमियम भरुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील सर्वांना या योजनेद्वारे आरोग्य विमा संरक्षण दिले आहे.या योजनेच्या रत्नागिरी व रायगड जिल्हा सहायक समन्वयक डॉ. प्रियांका कोंडे यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेस पात्र ४ लाख ८ हजार कुटूंब आहेत. आतापर्यंत १ हजार ६३५ लाभार्थींवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी ४ कोटी ६२ लाख ६२ हजार ६४४ रुपये खर्च आला. रत्नागिरी जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून लागू झाली आहे.रायगड जिल्ह्यात ही योजना २ जुलै २०१२ पासून लागू झाली आहे. येथे ५ लाख १९ हजार पात्र लाभार्थी कुटुंब असून, १२ हजार ३२७ लाभार्थ्यांवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी ३३ कोटी ८६ लाख ४७ हजार ७८९ रुपये खर्च आला. (प्रतिनिधी)