शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

क्लस्टर उपक्रमांतर्गत जिल्ह्यात दुग्धवाढ

By admin | Updated: June 28, 2016 00:34 IST

पशुसंवर्धन विभाग : शेतकऱ्यांना सधन बनविण्यासाठी प्रयत्न

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती करण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग क्लस्टर उपक्रमांतर्गत दुग्धोत्पादन वाढीसाठी प्रयत्नशीर आहे. आज जिल्ह्यात प्रतिदिन २ लाख ५५ हजार ३४२ लिटर्स दुग्धोत्पादन करण्यात येत आहे. क्लस्टर उपक्रमांतर्गत प्रतिदिन ३८९० लिटर्स दुग्धोत्पादन होत असून, दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १,६१,५०६९ असून, त्यांच्यासाठी प्रतिदिन ४ लाख ३६ हजार ६८ लिटर्स दुधाची आवश्यकता असताना आज जिल्ह्यात केवळ प्रतिदिन २ लाख ५५ हजार ३४२ लिटर्स दुग्धोत्पादन केले जाते. जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी असतानाही दुधाचे उत्पादन फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून विविध कंपन्यांच्या पावणेदोन लाख लिटर्स दुधाची विक्री होत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळाल्यास दुग्ध व्यवसायातून अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतात. त्यासाठी जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात २९ हजार १३३ दुग्धोत्पादक शेतकरी असून, २२२ नोंदणीकृत सहकारी दुग्धोत्पादक संस्था आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात ५२ दुग्धसंस्था कार्यान्वित असल्या तरी केवळ ४२ संस्था शासनाकडे दूध जमा करतात. संगमेश्वर तालुक्यात २१ आणि लांजा तालुक्यामध्ये ७ अशा एकूण २८ दुग्ध संस्था आहेत. या दोन्ही तालुक्यांमधील संस्थांचे सुमारे १५०० लाभार्थी सभासद आहेत. मात्र, या दुग्ध संस्थांकडून किरकोळ प्रमाणात दूध संकलन केले जात असून, ते सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी खूपच कमी आहे. या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहेत. यासाठी जिल्ह्यात क्लस्टर उपक्रम राबविण्यात येत असून, त्यातून प्रत्येक तालुक्यात १० हजार लिटर्स दूध उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक बाजारपेठही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जनतेला जिल्ह्यातूनच दूध मिळणार आहे. या दूधाची विक्री मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी ब्रँडही तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)प्रोत्साहन : चाऱ्यापासून मशीनपर्यंतदुधाळ जनावरांसाठी मुबलक हिरव्या वैरणीकरिता मका बियाणे व बहुवर्षीय चाऱ्याचे ठोंब वाटप करण्यात येणार आहेत. तसेच हायड्रोफोनिक्सद्वारे सकस वैरण उत्पादनाकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. अ‍ॅटोमेटिक मिल्कींग मशीनचाही वापर करण्यात येणार आहे.