शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

स्थलांतरणाची नोटीस जारी

By admin | Updated: August 27, 2014 23:26 IST

वडदहसोळमध्ये भीती : ५१ कुटुंबांना दक्षतेचा आदेश

राजापूर : पुण्यातील माळीण दुर्घटनेनंतर सावध झालेल्या महसूल प्रशासनाने वडदहसोळ गावातील ५१ कुटुंबीयांना तातडीने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.यापूर्वी २००९ साली झालेल्या लगतच्या डोंगराचा मोठा भाग तुटून खाली असलेल्या घरावर कोसळून म्हादये कुटुंबातील आठजण जागीच गाडले गेले होते, तर शिवणे बुद्रुक गावाकडे जाणारा रस्ता पूर्ण खचल्याने गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मागील सहा-सात वर्षांत अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने कोणतेच धोरण राबवलेले नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊनच राहावे लागत आहे.दरम्यान, पुण्यातील माळीण येथील जीवघेण्या घटनेनंतर हादरलेल्या प्रशासनाने तालुक्यातील धोकादायक परिसराची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी केली. त्याचा अहवाल १ आॅगस्ट २०१४ला राजापूर तहसीलदारांना सादर करण्यात आला. त्यानुसार तहसीलदारांनी वडदहसोळ गावातील म्हादयेवाडीतील १२, हळदीची खादवाडीतील ३५ आणि हसोळ गोपाळवाडीतील ४ अशा ५१ कुटुंबीयांना तत्काळ स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली. मात्र, या कुटुंबीयांनी नक्की कुठे जायचे. याबाबत त्या नोटीसमध्ये काहीच नमूद नाही. पर्यायी व्यवस्थादेखील केलेली नाही. त्यामुळे धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांपुढे अडचणी वाढल्या आहेत. शासनाच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. केवळ नोटीस बजावून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. पर्यायी जागा वेळेवर उपलब्ध करुन देण्याकामी शासन आपले कर्तव्य पार पाडणार नसेल तर त्या केवळ नोटिसीला अर्थ काय, सवाल ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)