शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

मध्यरात्री हाहा:कार

By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST

फुणगूस परिसर : वादळी वाऱ्यांमुळे ग्रामस्थांनी रात्र काढली जागून

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री भयंकर अशा वादळासह अवकाळी पावसाने अक्षरश: हैदोस घातला. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की मोठमोठी झाडे अक्षरश: उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या, तसेच अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. घराचे छप्पर उडाले, भिंती पडल्या, कौले उडाली. त्यामुळे मध्यरात्री एकच हाहाकार उडाला. वादळाच्या तडाख्यामुळे फुणगूस-डिंगणी खाडी भाग गेले अठरा तास अंधारात पडला आहे.मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरुवात झाली. परंतु, खऱ्या अर्थाने अवकाळीची वक्रदृष्टी संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागावर पडली आणि पावसासह वाऱ्याने देखील येथे नुकसानीला सुरूवात केली. हळुहळू पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढत गेला. जोडीलाच विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरु झाला. तेव्हा वादळाचे स्पष्ट संकेत दिसू लागले.रात्री १० च्या सुमारास वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. दुसऱ्या बाजूला पावसाचा जोरही वाढला आणि भयंकर असे वादळ परिसरात घोंघावू लागले. वादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढू लागला आणि लोकांची भीतीने गाळण उडाली. तोपर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता. वादळी वाऱ्याची तीव्रता इतकी भयंकर होती की विजेचे खांब जमिनीतून उन्मळून पडले. अनेक ठिकाणी लहान मोठी झाडे तुटून पडली. वादळाने जणू थैमान मांडले होते. निसर्गाच्या या रौद्ररुपाने ग्रामस्थ भयग्रस्त झाले होते.वीजेचे खांब, तारा, झाडे यांना दणका दिल्यानंतर वादळाने थेट घरांना लक्ष केले. अनेक घरांची कौले उडून गेली, पत्रे वाऱ्याच्या झोताबरोबर उखडून गेले. पुढे वादळाने अधिकच उग्ररूप धारण केले. अनेक घरांच्या पडव्या पडल्या, भिंती जमीनदोस्त झाल्या. डोळ्यांदेखत राहती घरे कोसळत असताना कोणीच काही करु शकत नव्हते. अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. वादळाच्या दणक्याने फुणगूस मोहल्ला येथील कादर हसन खान यांच्या पिठाच्या गिरणीचे छप्पर पूर्णपणे उडून गेले. चिऱ्याच्या भिंती कोसळल्या. त्यांच्याच घराच्या पडवीचेही छप्पर उडून गेले. हनिफ बोदले यांच्या घराची पडवी वादळाने जमीनदोस्त केली. अनेकांच्या घरावर झाडांच्या फांद्या पडून मोठे नुकसान झाले. नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही. वादळाने संपूर्ण खाडीपट्ट्यात थैमान घातले होते. डिंगणी, कुरधुंडा, कोंड्ये, मेढे, मांजरे अशा अनेक गावांना वादळाचा प्रचंड मोठा तडाखा बसला आहे. आंबा तसेच काजू बागांची दाणादाण उडाली. आंबाफळे गळून पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे. या वादळाने गतकाळातील फयान वादळाच्या स्मृती जाग्या केल्या. (वार्ताहर)