शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

शेतातही न गेलेला संदेश झाला शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला. नोकरीला लागून जेमतेम वर्षच झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले व नोकरी गेली. गावाकडे परतल्यानंतर सहा महिने काय करावे, हाच विचार सुरू होता. अखेर शेती करण्याचा निर्णय संदेशने घेतला. सहा महिने त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त होऊ लागल्याने भविष्यात शेतीच करायचा निर्णय त्याने घेतला आहे.

संदेशने आपला मित्र योगेश याला ही कल्पना सांगतातच, योगेशच्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. योगेश व धाकटा भाऊ सुयोग यांच्या मदतीने गावातील पडीक जमीन मक्तेदारी पद्धतीने घेऊन त्यामध्ये कलिंगड, भेंडी, वाली, वांगी, मका, मटार, हिरवी मिरची, काकडी लागवड केली असून, उत्पादन सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजन केले. भाड्याने ट्रॅक्क्टर घेऊन नांगरणी केली. वाफे तयार करून प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र भाग केले आहेत. लागवडीसाठी नर्सरीतून चांगल्या प्रकारची रोपे विकत आणली. खत व्यवस्थापन, योग्य नियोजन, यामुळे पिकेही तरारली व उत्पादन सुरू झाले. विक्रीवरही स्वत:च लक्ष केंद्रित केले आहे. शेतीमध्ये पैसा वाचवायचा असेल, तर अंगमेहनत प्रचंड आहे. चिकाटी व प्रयत्नाची जोड असेल, तर यश नक्कीच प्राप्त होते, म्हणून संदेशने आता नोकरीच्या मागे न लागता भविष्यात शेतीच करण्याचा निर्णय घेतला असून पावसाळ्यात कारली, भेंडी उत्पादन घेण्याचा मानस आहे.

कलिंगडाचे पीक धोक्यात

उष्म्यामुळे कलिंगडाचा खप चांगला होतो. त्यामुळे संदेशने कलिंगडाचे दोन स्वतंत्र प्लॉट तयार करून लागवड केली आहे. एका प्लॉटमध्ये संदेशला चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दुसऱ्या प्लॉटवर वेलमर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कलिंगडांची वाढ खुंटली आहे. मात्र, यामुळे निराश न होता, नव्या उमेदीने संदेश मेहनत घेत आहे. घरची अवघी सहा गुंठे जमीन, स्वत: शेतातही कधी न गेलेल्या संदेशने आता शेतीच करण्याचा निर्णय घेतला आहे.