शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

सदस्यत्वच धोक्यात

By admin | Updated: November 29, 2015 01:03 IST

ग्रामपंचायत निवडणुका : ४१४ सदस्यांनी खर्चच जमा केला नाही

राजापूर : राजापूर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील ४१४ ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने त्यांचे सभासदत्व धोक्यात आले आहे. ३० दिवसांच्या आत हे खर्चाचे विवरण पत्र न दिल्याने त्यांच्यावरील कारवाई अटळ बनली आहे.एप्रिल महिन्यात राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये बिनविरोध निवडणुका वगळता उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये ८१५ उमेदवार रिंगणात होते. निकाल लागल्यानंतर पुढील ३० दिवसांत उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचे विवरणपत्र निवडणूक कार्यालयाकडे सादर करावयाचे होते. मात्र, ४१४ ग्रामपंचायत सदस्यांनी ते अद्याप सादर केले नसल्याचे आढळून आले आहे.अणसुरे १२, मंदरुळ १७, शीळ ४, गोठणे दोनिवडे ९, दोनिवडे १०, कोंंडीवळे ११, आंबोळगड १९, सौंदळ १६, कुवेशी १८, शिवणेखुर्द ३, धोपेश्वर ६, महाळुंगे ४, कारवली १, सावडाव ४, ओशिवळे १०, पन्हळेतर्फे सौंदळ ५, कोळंब १७, काजिर्डा ९, मिळंद - सावडाव ९, हातदे ८, कुंभवडे ३, दळे ४, ओणी १०, चुनाकोळवण ७, कोदवली ८, पांगरे बु. ७, तळगाव ५, तारळ ९, वाडापेठ ८, कशेळी ११, कोंडसर १२, तुळसवडे ८, रायपाटण १५, ताम्हाणे १५, मोरोशी ५, चिखलगाव ४, आडवली १३, गोवळ ५, उन्हाळे ७, ससाळे २, पडवे ३, फुफेरे ३, आंबोळगड ११, पांगरेखुर्द ९, कोतापूर १, करक ६, हरळ ७, परटवली ७, वाल्ये ६ असा समावेश आहे.जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, त्यावर या सर्व उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)कारवाई होणार? : बहुतांशी विजयी उमेदवारराजापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य हे विजयी उमेदवार असून, त्यांच्यावर अपात्रतेची तर पराभूत उमेदवारांवर ५ वर्षे निवडणूक न लढवण्याची कारवाई होऊ शकते. या उमेदवारांनी आपल्या खर्चाचे तपशीलवार विवरण सादर न केल्याने ही कारवाई निश्चित मानली जात आहे.