शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भाजप चिंतन बैठकीतून कार्यकर्त्यांचा सभात्याग

By admin | Updated: March 8, 2017 23:21 IST

गुहागरमध्ये बैठक; जिल्ह्याध्यक्षांशी वादावादीनंतर कृती

गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात चिंतन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत गुहागरमध्येही बुधवारी ‘भाजप’ची बैठक घेण्यात आली; परंतु जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी सुरू केलेल्या वादावादीमुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभात्याग केल्याची घटना या बैठकीत घडली. जिल्हाध्यक्ष उपस्थित असतील, तर आम्ही सभेला बसणार नाही, असे ठणकावत सांगत उपस्थित कार्यकर्त्यांनी सभात्याग केल्याने सभाच निष्फळ ठरली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री दुर्गादेवी मंदिराशेजारील सभागृहात गुहागर तालुक्याचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्त्यांची दुपारी ३.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष बाळ माने उशिरा आल्याने ही सभा सायंकाळी ५.१५ वाजता सुरू झाली. सभेला जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासह शशिकांत चव्हाण, स्मिता जावकर, जिल्हा परिषद सदस्य स्मिता धामणसकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत बाईत, तालुकाध्यक्ष बावा भालेकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी बहुतांश उमेदवार व कार्यकर्ते असे ५० ते ६० जण यावेळी उपस्थित होते. ‘निवडणुकीत याने काम केले नाही, त्याने काम केले नाही’, अशी नेहमीच्या पठडीतील कारणमीमांसा न सांगता प्रत्येक उमेदवाराने पराभवाची कारणे सांगावीत,’ असे बाळ माने यांनी सुरुवातीलाच सांगितले. आपल्याच कार्यकर्त्याने विरोधात केलेले काम, उमेदवाराचे शिक्षण, उमेदवारी निश्चिती याबाबत उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सांगावयास सुरुवात केली; परंतु या सर्वांवर समाधानकार उत्तरे देण्यात आली नाहीत. पहिल्यांदा उमेदवार कोण होत? हे आपल्याला माहीत नाही, असेच सांगितले. पडवे गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला कसा? त्याठिकाणी दुसरा उमेदवार का दिला नाही, अशी चर्चा सुरू केली. या चर्चेदरम्यान तालुका खजिनदार रवींद्र कानिटकर यांना ‘तू कोण?’ अशी विचारणा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केल्याने सारेच अवाक् झाले. कानिटकर यांनी ओळख करून देताना गुहागर शहरात आपल्याच उपस्थितीत झालेल्या मागील बैठकीचा दाखला दिला; परंतु माने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी आमचे म्हणणे ऐकून न घेता उमेदवारांसह सर्वांना खाली बसावयास सांगत असाल तर मी निघतो, असे तालुका खजिनदाराने म्हटल्यावर त्यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे उपस्थित सर्वच कार्यकर्ते संतप्त झाले. (प्रतिनिधी)