शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

पर्यटन विकासासाठी वित्तमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: July 29, 2016 23:18 IST

मुंबईत बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदारांचा निर्णय

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने अद्याप निधी दिला नसल्याने आता या निधीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार पुढच्या आठवड्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तसेच विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी ६७० कोटींचा पर्यटन विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्राधान्यक्रमाने करावयाच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८० कोटींच्या आराखड्याची यादीही शासनाला देण्यात आली आहे. मात्र, या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ही कामे कागदावरच आहेत. या निधीसाठी पुढच्या आठवड्यात रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी घेतला आहे.जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमाच्या ८० कोटींच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील पर्यटकांच्या वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश वायकर यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत मुंबई येथे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, हुस्नबानू खलिफे, तसेच जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आदी उपस्थित होते.