शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नगराध्यक्षाच जनतेला वेठीस धरत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:32 IST

चिपळूण : सभागृहात बहुमताने मुदतवाढ दिलेली ३७ कामे नगराध्यक्षांनी अहंकार आणि राजकीय स्वार्थापायी अडवून ठेवली. त्या जनतेला वेठीस धरत ...

चिपळूण : सभागृहात बहुमताने मुदतवाढ दिलेली ३७ कामे नगराध्यक्षांनी अहंकार आणि राजकीय स्वार्थापायी अडवून ठेवली. त्या जनतेला वेठीस धरत आहेत, असा थेट आरोप महाविकास आघाडीने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. शहर विकासासाठी आम्ही दोन पावले पुढे आलो आहोत. त्यांनी किमान एक पाऊल तरी पुढे यावे, असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले.

उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेला बांधकाम सभापती मनोज शिंदे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेवक कबीर काद्री, नगरसेविका संगीता रानडे, सई चव्हाण, जयश्री चितळे, सुरय्या फकीर उपस्थित होते. यावेळी शशिकांत मोदी म्हणाले की, कोरोनामुळे ठप्प पडलेल्या ४८ विकास कामांना मुदतवाढ देण्याचा विषय २६ फेब्रुवारी २०२० च्या सभेत चर्चेला आला, तेव्हा ज्या कामाबद्दल तक्रारी आहेत किंवा वाद आहेत अशी कामे वगळून अन्य कामांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. त्यावेळी वादग्रस्त आणि तक्रार झालेली अशी ११ कामे प्रशासनाने बाजूला करून ३७ कामे मुदतवाढीसाठी सभागृहात ठेवली असता महाविकास आघाडीने सर्व ३७ कामांना मुदतवाढ देण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आम्ही पाठपुरावा सुरू केला. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांची वेळोवेळी भेट घेतली. मुदतवाढ दिलेली कामे अजूनही सुरू केलेली नाहीत, असा आरोप मोदी यांनी केला.

सुधीर शिंदे म्हणाले की, वेगवेगळी कारणे पुढे करून विकास कामांना अडवून ठेवणे ही नगराध्यक्षांची जुनी सवय आहे. स्वतःच त्रुटी काढायच्या, मंजूर कामामध्ये चुकीचे मुद्दे टाकायचे आणि मग ती कामे महाविकास आघाडीमुळे रखडली आहेत, असे जनतेसमोर आणायचे व महाविकास आघाडीची बदनामी करायची असे त्यांचे राजकारण सुरू आहे. मी सांगेन तेच धोरण आणि मी बांधेन तेच तोरण असा त्यांचा स्वभाव असून त्यांच्या या स्वभावामुळेच शहर विकासाला खो बसला आहे. पण आता आम्ही शांत बसणार नाही. येत्या शुक्रवारी प्रत्येक प्रभागातील नागरिकांना जमा करून नगराध्यक्ष नागरिकांची कशी दिशाभूल करताहेत आणि कशी जाणूनबुजून त्यांनी कामे अडवून ठेवली आहेत, ते निदर्शनास आणून देणार आहोत, असे स्पष्ट केले.

..........................

सांस्कृतिक केंद्राबाबत सकारात्मकच

सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे यासाठी महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका घेतली आहे. पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत या आमच्या नेत्यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. परंतु केंद्र लवकर सुरू व्हावे ही नगराध्यक्ष आणि प्रशासनाची मानसिकता नसल्याने केंद्र रखडून पडले आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.