शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

खड्डेमय रस्त्याच्या विराेधात संगमेश्वरात जनआंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी, खड्डेमय रस्त्याच्या विरोधात संगमेश्वर येथे साेमवारी मानवी साखळी जनआंदोलन करण्यात आले. जनतेच्या न्याय ...

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी, खड्डेमय रस्त्याच्या विरोधात संगमेश्वर येथे साेमवारी मानवी साखळी जनआंदोलन करण्यात आले. जनतेच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलकांच्या घोषणांनी संगमेश्वर परिसर दणाणून गेला होता.

समृद्ध कोकण संघटना आणि कोकण महामार्ग समन्वय समितीचे प्रमुख संजय यादवराव व राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, ॲड.ओवेस पेचकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर येथे युयुत्सु आर्ते, रमजान गोलंदाज, विवेक शेरे, अमोल लोध यांनी आंदोलनाची मूठ बांधली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या दिरंगाईमुळे कोकणवासीयांचा, प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे. या आंदोलनात जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा. शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय करावी. अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत. जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये. डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा. महामार्गावर विविध झाडे लावत देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा. दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाला परिसरातील लोकांनी, व्यापाऱ्यांनी, अनेक संघटनानी पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात जितेंद्र चव्हाण, मकरंद गांधी, जमूरत अलजी, रिंकू कोळवणकर, राजेंद्र पोमेंडकर, हरीभाई पटेल, तैमूर अलजी, गुलाम पारेख, अनंत पाताडे, दिनेश निंगावले, विनायक खातू, शादाब बोट, दिलदार कापडी, धनाजी भांगे, पपू सप्रे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

060921\3039img-20210906-wa0095.jpg

आंदोलन फोटो