शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

राजापुरातील बाजारपेठ आठ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केवळ मेडिकल व दूध वगळून सर्व दुकाने ...

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केवळ मेडिकल व दूध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राजापूर व्यापारी संघाने घेतला आहे. इतर सर्व दुकाने १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, मुख्याधिकारी देवानंद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रारंभी व्यापारी संघाने गुरूवारपासून संपूर्ण बाजारपेठ मेडिकल व दूध वगळून बंद ठेवण्याचा पर्याय प्रशासनासमोर ठेवला होता. मात्र, हा पर्याय प्रशासनाने अमान्य करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे बाजारपेठेतील किराणा दुकानेही बंद राहतील. केवळ घरपाेच सेवाच सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.

जर कोणी व्यापारी दुकानातून ग्राहकाला माल देताना आढळला किंवा ग्राहकाच्या पिशवीत माल आढळला तर त्याने दुकानदाराचे नाव सांगितल्यावर त्या दुकानदारावर दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्या ग्राहकावरही कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने ही दिनांक १५ मेपर्यंत बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे व दूध विक्री ही सकाळी ७ ते ११ यावेळेतच सुरु राहील, त्यानंतर ती दुकानेही बंद करायची आहेत, असे मालपेकर यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. व्यापाऱ्यांनी आपली स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.