शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

मराठा समाजाने आत्मशोधासाठी वाचन करावे

By admin | Updated: March 29, 2016 00:18 IST

तानाजी घरत : शिवजयंतीदिनी ‘मराठा तितुका मेळवावा, गुणदोषासह स्वीकारावा’ संकल्पना

शिरगाव : मराठा, बहुजन समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शिवकाळात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य संकल्पना सत्यात आणली. सर्वच लढणारे होते. मात्र, पुढील पिढीला सांगणारे, लिहिणारे नव्हते. आमच्यासमोर आले ते चिकित्सा न करता स्वीकारले. मराठा समाजच नेतृत्त्वास लायक असल्याचे एकूण आजची स्थिती पाहता समजते. मात्र, आपला मेंदू गुलाम असेल, तर समाजाला आपण पुढे नेऊ शकणार नाही. मन, मनगट, मेंदू, मस्तक सशक्त असणारे मराठे समाजाचा, देशाचा आधारस्तंभ बनतील, यासाठी समाजाने आत्मशोध घेण्यासाठी वाचन करावे, असे विचार मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक तानाजी घरत यांनी चिपळूण येथे मांडले. चिपळूण तालुका मराठा सेवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त चिपळुणात संस्थेचे संकल्प जाणून ‘मराठा तितुका मेळवावा, गुणदोषासह स्वीकारावा’ ही संकल्पना मांडली. बऱ्याचवेळा आपण अहंकार, अनावश्यक स्पर्धा करतो. सांघिक एकोप्यातील ताकदीपेक्षा स्वत:च्या ताकदीवर आपला जास्त विश्वास असतो. अवघ्या महाराष्ट्राचे चित्र पाहता कधीच दुष्काळ न पडणाऱ्या कोकणात अधिक गतिमान राहायला हवे. मात्र, आमचीच ओळख स्वत:ला न झाल्याने स्वराज्याला ४०० वर्षे झाली. आम्ही विशेष काही केले नाही, याबाबत खंत व्यक्त केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुधीर भोसले यांनी स्त्री शक्तीचे प्रतीक राजमाता जिजाऊंचे, छत्रपती शिवरायांचे खरे चरित्र जाणण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी सिंधखेडची शिवसृष्टी पाहावी. सर्वांना बरोबरीने पुढे नेणाऱ्या मराठ्यांनी आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या मागासले आहोत, हे अगोदर कबूल करावेच लागेल. दि. १९ फेब्रुवारीही एकच तारीख जगात एकाच दिवशी शिवजयंती होण्यासाठी विचार मंथनातून ठरली. मराठ्यांचा इतिहास जगाने अभ्यासला. मात्र, विभागून भारतरत्न दिलेले संगणकतज्ञ विजय भटकरवगळता भारतरत्न कोण झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकाराने मराठा समाज एकत्रिकरण, विविध सामाजिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून स्थापित संस्थेला जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजप तालुकाध्यक्ष रामदास राणे, राष्ट्रवादी युवकचे मयूर खेतले, मराठा सेवा संघ कोकण विभाग सचिव बाळकृष्ण परब यांनी शुभेच्छा दिल्या, तर कार्यास प्रारंभी देणगीदाखल १ लाख रुपये व शिवप्रतिमा कापसाळ येथील सतीश मोरे यांनी दिली. राष्ट्रसेवा दल, स्वरदर्शन कलाकुंज, चिपळूणतर्फे रवींद्र चव्हाण, संतोष जाधव, उत्तरा भागवत, राहुल साडविलकर, दिलीप सकपाळ यांनी पोवाडा सादर केला. शिक्षक नियोजनबध्दरित्या समाजाचे प्रश्न सोडवण्यात पुढे आल्याबद्दल विविध कंपन्या, बँकांतील सुजाण नागरिक, समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मराठा समाजातील १५० महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संकेश गायकवाड, राजेंद्र महाडिक, संतोष शिंदे, बाबासाहेब भोसले, सचिन चव्हाण, नरेश मोरे, बळीराम मोरे, विकास नलावडे, दीपक शिंदे, विलास गुजर, जयेंद्र शिंदे यांनी योगदान दिले. (वार्ताहर)चिपळूण येथील मराठा सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन.मराठा, बहुजनांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी स्वराज्य संकल्पना.आपला मेंदू गुलाम असेल, तर समाजाला पुढे नेऊ शकत नाही.