शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मंजुरीत अडकले ३८३ प्रस्ताव

By admin | Updated: September 7, 2014 00:34 IST

अधिस्थगन उठवले : पाच तालुके अडकले बंदीच्या फेऱ्यात

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील अधिस्थगन उठविल्याने या तालुक्यातील १०३ गावांमधील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित पाच तालुक्यांतील १३८ गावांमधील ३८३ प्रस्ताव २०१०सालापासून बंदीत अडकल्याने जिल्हा प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडाला आहे. पश्चिम घाट संरक्षित करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणात अधिस्थगन लागू केला. त्यामुळे गौण खनिजावर बंदी घालण्यात आली. या बंदीचा फटका या दोन्ही जिल्ह्यातील चिरेखाणमालक, वाळू व्यावसायिक यांना बसल्याने सुमारे तीन वर्षे त्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील एकूण पाठविण्यात आलेले २४१ गावांमधील एकूण ६९७ प्रस्ताव या बंदीत अडकलेले होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमधील गौण खनिज उत्खननावरील बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाळू, चिरे व्यावसायिकांचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत.मात्र, उर्वरित लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या पाच तालुक्यांतील इको सेन्सेटिव्ह २९२ गावे वगळून उर्वरित ६३० गावांवरील बंदी उठविण्यात आली होती. त्यामुळे यापैकी १३८ गावांमधून ३८३ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यात जांभा, काळा दगड आणि माती उत्खननाच्या प्रस्तावाचा समावेश होता. मात्र, त्यावरही बंदी आल्याने हे प्रस्ताव प्रशासनाच्या दफ्तरी मंजुरीसाठी गेल्या चार वर्र्षापासून अद्याप पडून आहेत. त्यामुळे या कालावधीत या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.या प्रस्तावधारकांना १०० ते ५०० ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात येणार होती. उत्खननावर प्रतिब्रास २०० रूपये रॉयल्टी आकारली जाते. त्यामुळे मंजुरीविना पडून असलेल्या या ३८३ प्रस्तावांमुळे जिल्हा प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल वाया गेला आहे. येत्या १० रोजी या पाच तालुक्यांतील २९२ गावे वगळून उर्वरित ६३० गावांवरील बंदीबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या गावातील व्यावसायिक या दिवशीच्या निर्णयाची मोठ्या आशेने वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)