शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीत अडकले ३८३ प्रस्ताव

By admin | Updated: September 7, 2014 00:34 IST

अधिस्थगन उठवले : पाच तालुके अडकले बंदीच्या फेऱ्यात

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील अधिस्थगन उठविल्याने या तालुक्यातील १०३ गावांमधील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित पाच तालुक्यांतील १३८ गावांमधील ३८३ प्रस्ताव २०१०सालापासून बंदीत अडकल्याने जिल्हा प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडाला आहे. पश्चिम घाट संरक्षित करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणात अधिस्थगन लागू केला. त्यामुळे गौण खनिजावर बंदी घालण्यात आली. या बंदीचा फटका या दोन्ही जिल्ह्यातील चिरेखाणमालक, वाळू व्यावसायिक यांना बसल्याने सुमारे तीन वर्षे त्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील एकूण पाठविण्यात आलेले २४१ गावांमधील एकूण ६९७ प्रस्ताव या बंदीत अडकलेले होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमधील गौण खनिज उत्खननावरील बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाळू, चिरे व्यावसायिकांचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत.मात्र, उर्वरित लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या पाच तालुक्यांतील इको सेन्सेटिव्ह २९२ गावे वगळून उर्वरित ६३० गावांवरील बंदी उठविण्यात आली होती. त्यामुळे यापैकी १३८ गावांमधून ३८३ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यात जांभा, काळा दगड आणि माती उत्खननाच्या प्रस्तावाचा समावेश होता. मात्र, त्यावरही बंदी आल्याने हे प्रस्ताव प्रशासनाच्या दफ्तरी मंजुरीसाठी गेल्या चार वर्र्षापासून अद्याप पडून आहेत. त्यामुळे या कालावधीत या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.या प्रस्तावधारकांना १०० ते ५०० ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात येणार होती. उत्खननावर प्रतिब्रास २०० रूपये रॉयल्टी आकारली जाते. त्यामुळे मंजुरीविना पडून असलेल्या या ३८३ प्रस्तावांमुळे जिल्हा प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल वाया गेला आहे. येत्या १० रोजी या पाच तालुक्यांतील २९२ गावे वगळून उर्वरित ६३० गावांवरील बंदीबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या गावातील व्यावसायिक या दिवशीच्या निर्णयाची मोठ्या आशेने वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)