शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

लाॅकडाऊन काळातही आंबा वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने कडक निर्बंधातही आंबा वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यातही वाशी बाजारात आंब्याच्या खरेदीविक्रीच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने त्यालाही सुसूत्रता आली आहे. त्याच वेळी बागायतदारांनी आंब्याच्या थेट विक्रीवर भर दिला असून, ती वाहतूकही सुरळीत आहे.

हापूसच्या विक्रीसाठी बहुतांश शेतकरी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून आहेत. गतवर्षी लाॅकडाऊन काळात वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने खरेदी विक्रीचे व्यवसाय ठप्प होते. शेतकऱ्यांना खासगी विक्री करावी लागली. या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीविक्री व्यवस्था करताना गर्दी टाळण्यासाठी दोन सत्रांत विभागणी केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत वाशी मार्केटमध्ये पोहोचलेल्या वाहनातील आंब्याची विक्री सकाळी नऊ वाजता सुरू होते. सकाळी सातनंतर आलेल्या वाहनातील आंबा पेट्यांची विक्री दुपारनंतर होते. शेतकरीही त्याप्रमाणे नियोजन करून आंबा काढणी, पॅकिंग प्रक्रिया वेळेवर पूर्ण करीत आहेत.

गुढीपाडव्यापासून वाशी मार्केटमधील आवक वाढली आहे. दररोज ३४ ते ३५ हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. १,५०० ते ३,५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

आंबा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने आंबा काढणीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना कडक संचारबंदीतून वगळले आहे. गतवर्षीप्रमाणे शासकीय पासचे निर्बंधही हटविण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदा बागायतदारांसमाेर समस्या नाहीत. कोरोनाचे संकट, शिवाय उत्पादन कमी असतानाही आंबा काढणी, विक्री, तसेच वाहतूक व्यवस्थेची समस्या तरी यंदा नाही.