शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

आंबा हंगाम अंतिम टप्यात : दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

रत्नागिरी : आधीच लहरी वातावरणाचा बसलेला फटका, त्यातच काेराेनामुळे आलेले निर्बंध यामुळे आंबा बागायतदार समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत़ त्यातून ...

रत्नागिरी : आधीच लहरी वातावरणाचा बसलेला फटका, त्यातच काेराेनामुळे आलेले निर्बंध यामुळे आंबा बागायतदार समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत़ त्यातून आंबा हंगाम सुरू झाल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका बसला़ त्यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आले़ आता आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे़ आंबा हंगाम संपत आल्याने दरात काहीशी घट करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे़

‘निसर्ग’ चक्रीवादळासह बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा हंगामावर झाला. पावसाळा लांबला मात्र त्यातुलनेत थंडी गायब राहिली त्यामुळे फुलोरा फारसा झाला नाही. जेमतेम १५ ते २० टक्केच पीक उत्पादन शेतकऱ्यांना लाभले. मार्चपासून आंबा बाजारात आला़ मात्र त्याचे प्रमाण कमी राहिले. उत्पादन कमी असल्याने सुरुवातीला दर टिकून होते. पण आवक वाढल्याने दर कमी झाले असून, सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. हजार ते पंधराशे रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.यावर्षी आंबा हंगाम दोन टप्प्यात राहिला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १५ मेपर्यंत संपणार आहे. गेल्या २५ ते ३० वर्षात प्रथमच एवढ्या लवकर आंबा हंगाम संपणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंबा दि. २५ मे नंतर सुरू होऊन दि. १० जूनपर्यंत संपणार आहे. सध्या हा आंबा कोवळा आहे. शिवाय पावसाने तारले तर हा आंबा शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. मात्र, हा आंबा फारच कमी असून निवडक शेतकऱ्यांनी विशेष फवारणी करून आंबा वाचविला आहे. जेमतेम पाच ते सात टक्के शेतकऱ्यांकडेच शेवटच्या टप्प्यातील आंबा उपलब्ध आहे.

यावर्षी आंबा हंगाम अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून बाजारपेठेत पाठवेपर्यंत येणारा खर्च वसूल होणे अवघड झाले आहे. कोरोनामुळे वाशी बाजारसमितीमध्ये आंबा विक्री सुरू आहे. मात्र त्या तुलनेत दर नाहीत. त्यामुळे खासगी विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. जाग्यावर पंधराशे ते दोन हजार रूपये दराने आंबा पेटी खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी जाग्यावरच विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च, हमाली वाचत आहे. चांगला आंबा वर्गवारी करून शेतकरी विक्रीसाठी पाठवित असले तरी उर्वरित आकाराने लहान फळ तसेच डाग असलेले फळ बाजारात विक्रीसाठी चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी आंबा किलोवर घालत आहे. २८ रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे. आंब्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

----------------------------

यावर्षीचा एकूणच आंबा हंगाम निराशाजनक राहिला आहे. उत्पादन अत्यल्प राहिले. हवामानातील बदलामुळे आंबा पीक वाचविण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यातुलनेत दरही समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. काही निवडक शेतकऱ्यांकडे शेवटचा आंबा आहे. मात्र तो काढण्यासाठी अजून १५ ते २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- राजन कदम, आंबा बागायतदार, रत्नागिरी.