शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगाम अंतिम टप्यात : दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

रत्नागिरी : आधीच लहरी वातावरणाचा बसलेला फटका, त्यातच काेराेनामुळे आलेले निर्बंध यामुळे आंबा बागायतदार समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत़ त्यातून ...

रत्नागिरी : आधीच लहरी वातावरणाचा बसलेला फटका, त्यातच काेराेनामुळे आलेले निर्बंध यामुळे आंबा बागायतदार समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत़ त्यातून आंबा हंगाम सुरू झाल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका बसला़ त्यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आले़ आता आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे़ आंबा हंगाम संपत आल्याने दरात काहीशी घट करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे़

‘निसर्ग’ चक्रीवादळासह बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा हंगामावर झाला. पावसाळा लांबला मात्र त्यातुलनेत थंडी गायब राहिली त्यामुळे फुलोरा फारसा झाला नाही. जेमतेम १५ ते २० टक्केच पीक उत्पादन शेतकऱ्यांना लाभले. मार्चपासून आंबा बाजारात आला़ मात्र त्याचे प्रमाण कमी राहिले. उत्पादन कमी असल्याने सुरुवातीला दर टिकून होते. पण आवक वाढल्याने दर कमी झाले असून, सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. हजार ते पंधराशे रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.यावर्षी आंबा हंगाम दोन टप्प्यात राहिला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १५ मेपर्यंत संपणार आहे. गेल्या २५ ते ३० वर्षात प्रथमच एवढ्या लवकर आंबा हंगाम संपणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंबा दि. २५ मे नंतर सुरू होऊन दि. १० जूनपर्यंत संपणार आहे. सध्या हा आंबा कोवळा आहे. शिवाय पावसाने तारले तर हा आंबा शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. मात्र, हा आंबा फारच कमी असून निवडक शेतकऱ्यांनी विशेष फवारणी करून आंबा वाचविला आहे. जेमतेम पाच ते सात टक्के शेतकऱ्यांकडेच शेवटच्या टप्प्यातील आंबा उपलब्ध आहे.

यावर्षी आंबा हंगाम अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून बाजारपेठेत पाठवेपर्यंत येणारा खर्च वसूल होणे अवघड झाले आहे. कोरोनामुळे वाशी बाजारसमितीमध्ये आंबा विक्री सुरू आहे. मात्र त्या तुलनेत दर नाहीत. त्यामुळे खासगी विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. जाग्यावर पंधराशे ते दोन हजार रूपये दराने आंबा पेटी खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी जाग्यावरच विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च, हमाली वाचत आहे. चांगला आंबा वर्गवारी करून शेतकरी विक्रीसाठी पाठवित असले तरी उर्वरित आकाराने लहान फळ तसेच डाग असलेले फळ बाजारात विक्रीसाठी चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी आंबा किलोवर घालत आहे. २८ रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे. आंब्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

----------------------------

यावर्षीचा एकूणच आंबा हंगाम निराशाजनक राहिला आहे. उत्पादन अत्यल्प राहिले. हवामानातील बदलामुळे आंबा पीक वाचविण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यातुलनेत दरही समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. काही निवडक शेतकऱ्यांकडे शेवटचा आंबा आहे. मात्र तो काढण्यासाठी अजून १५ ते २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- राजन कदम, आंबा बागायतदार, रत्नागिरी.