शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

लाॅकडाऊनमध्ये वाशी येथील आंबा विक्री सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, रविवार दोन दिवस सर्व प्रकारची दुकाने व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंना परवानगी दिली आहे. त्यामुळे वाशी येथील आंबा विक्री व्यवस्था सुरू राहणार असणार असल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.

ऋतुमानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. बहुतांश आंबा बागायतदार वाशी येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवित आहेत. शिवाय सुरत, अहमदाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवितात. वास्तविक आंबा झाडावरून काढल्यानंतर तो विक्रीसाठी तातडीने पाठविण्यात येतो. मात्र अंतर अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आंबा मार्केटमध्ये पोहोचला तर त्यादिवशी विक्री होते. अन्यथा विक्रीसाठी तिसरा दिवस उजाडतो. नाशिवंत माल यामध्ये मोडत असल्याने आंबा विक्रीसाठी पाठविण्याबाबत शेतकरी सजग असतात.

लाॅकडाऊनच्या घोषणेमुळे आंबा बागायतदारही धास्तावले होते. त्यांनी तातडीने प्रशासन तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना जीवनावश्यक वस्तूंना परवानगी असल्याने मार्केटमधील खरेदी, विक्रीचे व्यवहार सुरळीत असणार असल्याचे सांगण्यात आल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.

खासगी विक्रेतेही सरसावले

गतवर्षी वाशी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यामुळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र खासगी विक्रेत्यांनी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंबा खरेदी करून विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. यावर्षीही विक्रेते बागायतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. परंतु खासगी विक्रीमध्ये काही विक्रेते शेतकऱ्यांचे पैसे देताना त्रास देत असल्याचा गतवर्षीचा अनुभव असल्याने बागायतदार वाशी मार्केटवर अवलंबून आहेत.

कोट घ्यावा

आठवड्यातून दोन दिवस लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला रविवारी सुटी असते. जीवनावश्यक वस्तूंसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी विक्री सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात आंबा मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान होणार नाही.

- संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती