शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

लाॅकडाऊनमध्ये वाशी येथील आंबा विक्री सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, रविवार दोन दिवस सर्व प्रकारची दुकाने व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंना परवानगी दिली आहे. त्यामुळे वाशी येथील आंबा विक्री व्यवस्था सुरू राहणार असणार असल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.

ऋतुमानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. बहुतांश आंबा बागायतदार वाशी येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवित आहेत. शिवाय सुरत, अहमदाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवितात. वास्तविक आंबा झाडावरून काढल्यानंतर तो विक्रीसाठी तातडीने पाठविण्यात येतो. मात्र अंतर अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आंबा मार्केटमध्ये पोहोचला तर त्यादिवशी विक्री होते. अन्यथा विक्रीसाठी तिसरा दिवस उजाडतो. नाशिवंत माल यामध्ये मोडत असल्याने आंबा विक्रीसाठी पाठविण्याबाबत शेतकरी सजग असतात.

लाॅकडाऊनच्या घोषणेमुळे आंबा बागायतदारही धास्तावले होते. त्यांनी तातडीने प्रशासन तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना जीवनावश्यक वस्तूंना परवानगी असल्याने मार्केटमधील खरेदी, विक्रीचे व्यवहार सुरळीत असणार असल्याचे सांगण्यात आल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.

खासगी विक्रेतेही सरसावले

गतवर्षी वाशी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यामुळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र खासगी विक्रेत्यांनी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंबा खरेदी करून विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. यावर्षीही विक्रेते बागायतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. परंतु खासगी विक्रीमध्ये काही विक्रेते शेतकऱ्यांचे पैसे देताना त्रास देत असल्याचा गतवर्षीचा अनुभव असल्याने बागायतदार वाशी मार्केटवर अवलंबून आहेत.

कोट घ्यावा

आठवड्यातून दोन दिवस लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला रविवारी सुटी असते. जीवनावश्यक वस्तूंसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी विक्री सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात आंबा मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान होणार नाही.

- संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती