शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्ये वाशी येथील आंबा विक्री सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, रविवार दोन दिवस सर्व प्रकारची दुकाने व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंना परवानगी दिली आहे. त्यामुळे वाशी येथील आंबा विक्री व्यवस्था सुरू राहणार असणार असल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.

ऋतुमानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. बहुतांश आंबा बागायतदार वाशी येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवित आहेत. शिवाय सुरत, अहमदाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवितात. वास्तविक आंबा झाडावरून काढल्यानंतर तो विक्रीसाठी तातडीने पाठविण्यात येतो. मात्र अंतर अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आंबा मार्केटमध्ये पोहोचला तर त्यादिवशी विक्री होते. अन्यथा विक्रीसाठी तिसरा दिवस उजाडतो. नाशिवंत माल यामध्ये मोडत असल्याने आंबा विक्रीसाठी पाठविण्याबाबत शेतकरी सजग असतात.

लाॅकडाऊनच्या घोषणेमुळे आंबा बागायतदारही धास्तावले होते. त्यांनी तातडीने प्रशासन तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना जीवनावश्यक वस्तूंना परवानगी असल्याने मार्केटमधील खरेदी, विक्रीचे व्यवहार सुरळीत असणार असल्याचे सांगण्यात आल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.

खासगी विक्रेतेही सरसावले

गतवर्षी वाशी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यामुळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र खासगी विक्रेत्यांनी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंबा खरेदी करून विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. यावर्षीही विक्रेते बागायतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. परंतु खासगी विक्रीमध्ये काही विक्रेते शेतकऱ्यांचे पैसे देताना त्रास देत असल्याचा गतवर्षीचा अनुभव असल्याने बागायतदार वाशी मार्केटवर अवलंबून आहेत.

कोट घ्यावा

आठवड्यातून दोन दिवस लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला रविवारी सुटी असते. जीवनावश्यक वस्तूंसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी विक्री सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात आंबा मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान होणार नाही.

- संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती