शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

स्थानिक बाजारपेठेतील हापूस आंब्याचे भाव कोसळले

By admin | Updated: May 23, 2016 00:17 IST

हंगाम समाप्तीकडे : कॅनिंगच्या दरावरही परिणाम

रत्नागिरी : आंबापीक शेवटच्या टप्प्यात असून, मुंबई मार्केटबरोबर स्थानिक बाजारपेठेत दर कोसळले आहेत. कॅनिंगच्या दरावरही त्याचा परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना झाडावरील आंबा उतरविण्याची संधी प्राप्त झाली आहे.मान्सूनपूर्व पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेवटच्या टप्प्यातील आंबा काढणे शक्य झाले आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे दरवर्षीपेक्षा आंबा लवकर बाजारात आला. मात्र प्रमाण अत्यल्प होते. थंडीमुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाल्याने त्याचा फटका सर्वाधिक बसला. जेमतेम २० ते २५ टक्के आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. एकूणच पीक कमी असताना सुरूवातीपासूनच दर स्थिर राहिले नाहीत. वाशी मार्केटबरोबर स्थानिक मार्केटमध्येही दर कोसळले. सध्या वाशी मार्केटमध्ये पेटीला दर ५०० रुपये देण्यात येत आहे. आंबा काढणीपासून वर्गवारी, पॅकिंग, हमाली, दलाली खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम तूटपुंजी असल्यामुळे मुंबईला आंबा विक्रीस पाठवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात शेतकरी आंबा विक्री करत आहेत. रस्त्याच्या कडेलाही काही शेतकरी आंबा विक्री करीत आहेत. सध्या स्थानिक बाजारात १०० ते २५० रुपये डझनाने आंबा विकण्यात येत आहे. कॅनिंगच्या दरातही घसरण झाली आहे. दर १८ ते २० रुपयांवर स्थिरावला आहे. जिल्हाभरातून दररोज हजारो टन आंबा खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचे प्रमाण घटले आहे. उष्मा वाढल्याने झाडावरच आंबा पिकू लागला आहे. कॅनिंग विक्रेते हा आंबा स्वीकारत नाहीत. त्यामुळे विक्रीबरोबर आमरस, मावा, आंबावडी तयार करण्यासाठी त्याचा वापर सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी घरगुती उत्पादनाकडे मोर्चा वळविला आहे. पर्यटकांकडून आंबा खरेदीबरोबर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष मागणी होत आहे.छोट्या बिटक्या, रायवळ, पायरी केसर जातीचे आंबे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पावसाने अवधी दिल्यामुळे शेतकरी शेवटच्या टप्प्यातील आंबा काढून घेत आहेत. शोधणीचा आंबा काढणी सुरू आहे. येत्या आठवडाभरात हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.फळप्रक्रिया केंद्रात मात्र सध्या कामाची लगबग दिसून येत आहे. आमरस, आंबावडी, छुंदा, लोणचे, मुरांबा यांसारखे पदार्थ तयार केले जात आहेत. फळप्रक्रिया केंद्राकडून आंबा कमी किमतीत खरेदी केला जात आहे. मात्र, त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीतून अधिक पैसे उद्योजकाला उपलब्ध होणार आहेत. यावर्षी आंबा उत्पादन घटल्यामुळे प्रक्रिया उत्पादनातही घट झाली आहे. (प्रतिनिधी)