शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आंबा, काजूवर वाढत्या उष्म्याचा परिणाम नाही

By admin | Updated: April 18, 2017 13:44 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जागृती

आॅनलाईन लोकमतदापोली , दि. १८ : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. तसेच दोन दिवसात राज्यात उन्हाच्या पाऱ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने याचा परिणाम तयार फळबागांवर होईल की काय, या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसून अशा उन्हाच्या कडाक्याचा परिणाम तयार फळांवर होत नसल्याचे येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.आंबा, काजू ही फळे लहान असताना यांच्यावर तुडतुडे, बुरशी यांसारखे रोग होतात, तर प्रचंड ऊन पडल्यामुळे मोहोर करपतो आणि बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. परंतु एकदा का फळ तयार झाले की, त्यावर उन्हाचा कोणताही परिणाम जाणवत नाही किंंवा उन्हामुळे सहजासहजी आंबा पिकतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. हिवाळ्यापासून शेतकरी आपल्या बागायतींच्या देखभालीकडे लक्ष ठेवून असतो. झाडांना पाणी देणे, झाडांवर फवारणी करणे अशा प्रकारची काळजी घेत असतात.परंतु काही वेळा योग्य त्या औषधांची फवारणी केली नाही तर या झाडांवर किंवा फळांवर बुरशी, तुडतुडे अशा प्रकारचे रोग निर्माण होतात. त्यामुळे आंबा, काजूचे नुकसान होते. त्यामुळे बागायतदारांनी आपल्या बागेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु उन्हाचा पारा वाढणार असला तरी सर्व फळे तयार झालेली असताना त्यांच्यावर परिणाम जाणवणार नसल्याचे विद्यापीठाकडून चौकशीदरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे वाढत्या उष्म्याची बागायतदारांनी काळजी करण्याचे गरज नाही. तसेच काही वाटल्यास विद्यापीठाकडे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे व त्याप्रमाणे उपाययोजना करावी, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)