शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

आंबा, काजूवर वाढत्या उष्म्याचा परिणाम नाही

By admin | Updated: April 18, 2017 13:44 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जागृती

आॅनलाईन लोकमतदापोली , दि. १८ : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. तसेच दोन दिवसात राज्यात उन्हाच्या पाऱ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने याचा परिणाम तयार फळबागांवर होईल की काय, या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसून अशा उन्हाच्या कडाक्याचा परिणाम तयार फळांवर होत नसल्याचे येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.आंबा, काजू ही फळे लहान असताना यांच्यावर तुडतुडे, बुरशी यांसारखे रोग होतात, तर प्रचंड ऊन पडल्यामुळे मोहोर करपतो आणि बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. परंतु एकदा का फळ तयार झाले की, त्यावर उन्हाचा कोणताही परिणाम जाणवत नाही किंंवा उन्हामुळे सहजासहजी आंबा पिकतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. हिवाळ्यापासून शेतकरी आपल्या बागायतींच्या देखभालीकडे लक्ष ठेवून असतो. झाडांना पाणी देणे, झाडांवर फवारणी करणे अशा प्रकारची काळजी घेत असतात.परंतु काही वेळा योग्य त्या औषधांची फवारणी केली नाही तर या झाडांवर किंवा फळांवर बुरशी, तुडतुडे अशा प्रकारचे रोग निर्माण होतात. त्यामुळे आंबा, काजूचे नुकसान होते. त्यामुळे बागायतदारांनी आपल्या बागेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु उन्हाचा पारा वाढणार असला तरी सर्व फळे तयार झालेली असताना त्यांच्यावर परिणाम जाणवणार नसल्याचे विद्यापीठाकडून चौकशीदरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे वाढत्या उष्म्याची बागायतदारांनी काळजी करण्याचे गरज नाही. तसेच काही वाटल्यास विद्यापीठाकडे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे व त्याप्रमाणे उपाययोजना करावी, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)