शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

कॅनिंग सुरू झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : यावर्षी लांबलेल्या पावसामुळे आंब्याचा हंगाम नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा उत्पादन अत्यल्प असतानाही कॅनिंग सुरू झाले ...

रत्नागिरी : यावर्षी लांबलेल्या पावसामुळे आंब्याचा हंगाम नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा उत्पादन अत्यल्प असतानाही कॅनिंग सुरू झाले असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कॅनिंग सुरू झाल्यानंतर आंब्याची चोरी वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील पहारा कडक केला आहे.

मार्चमध्ये आंबा बाजारात आला; परंतु उत्पादन अत्यल्प होते. एप्रिलमध्येही आंबा उत्पादन फारच कमी हाती आले आहे. तयार झालेला आंबा शेतकरी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद मार्केटमध्ये विक्रीला पाठवित आहेत. दराचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी खासगी विक्रीवरही विशेष भर दिला आहे.

वातावरणातील बदलांमुळे आंब्यावर रोग पडण्याचे प्रमाण अधिक आहे. तुडतुड्याच्या विष्ठेमुळे आंब्यावर काळे डाग पडतात. अशा आंब्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे निवडक आंब्याच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा किलोवर विकल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या रोखीने पैसे मिळतात. ग्रामीण भागाबरोबर शहरातही कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यात येत आहे. आंबा उत्पादन कमी असतानाही कॅनिंगला समाधानकारक दर मिळत नसल्याचे वातावरण आहे. २५ ते २६ रुपये किलो दराने खरेदी सुरू आहे. आंबा कमी असल्याने बाजारात त्याला चांगला दर अपेक्षित असतानाच कॅनिंग सुरू झाले आहे. कॅनिंगसाठी आंबा खरेदी सुरू झाल्यानंतर आंब्याची चोरी होण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सध्या बागेत जागता पहारा ठेवला आहे.

..........................

कॅनिंग व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. चोरी वाढत असल्यामुळे बागायतदार किंवा कराराने बागा घेऊन व्यवसाय करणाऱ्यांकडूनच कॅनिंग विक्रेत्यांनी आंबा विकत घ्यावा. चोरीचा किंवा रात्री अपरात्री आंबा विक्रीस आणणाऱ्यांकडून आंबा विकत घेऊ नये. जेणेकरून चोरीला आळा बसेल. वास्तविक आंबा पीक येईपर्यत प्रचंड खर्च करावा लागत असल्यामुळे या व्यवसायावर कुठेतरी नियंत्रण येणे आवश्यक आहे.

- एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी