शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आंबा घाट सुरू होण्यास अजून लागणार दीड महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून ...

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून रेटिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधण्यात येणार आहे. सुमारे साडेचार कोटींचे हे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिना लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आंबा घाट सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सुभाष बने यांनी दिली. मात्र, याबाबत जिल्हा पोलीस दल आणि राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाने आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी अजूनही धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फक्त छोट्या वाहनांना आंबा घाटातून परवानगी आहे. आंबा घाटात २२ जुलैला मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. दरड हटवण्याचे काम पंधरा दिवस सुरू होते; मात्र, दरड हटवल्यानंतर दोन ठिकाणी अधिक धोकादायक स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यापैकी एका ठिकाणी रस्त्याची एक बाजू पूर्ण खचली ते अधिक धोकादायक आहे.

खचलेल्या अर्धा रस्त्यामध्ये कठडा बांधून डोंगराच्या बाजूला गटारावर स्लॅब टाकून रस्ता वाढवण्यात आला आहे. आणखी एका ठिकाणी डोंगर घसरून तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात गेला आहे. तो भाग पुन्हा कधीही खचण्याची शक्यता आहे. अन्य दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. अवजड वाहनांमुळे खचलेल्या या रस्त्यांचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अवजड वाहतुकीला आंबा घाटातून बंदी घातली आहे.

प्राधिकरणाने आंबा घाटातील या दोन धोकादायक ठिकाणांच्या दुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. याचे काम लवकरच सुरू होणार असून अजून दीड महिन्यांनंतर आंबा घाट सुरू होईल, असा अंदाज प्रकल्प संचालक पंदरकर यांनी सांगितले.