शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

आंबा घाट सुरू होण्यास अजून लागणार दीड महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून ...

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून रेटिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधण्यात येणार आहे. सुमारे साडेचार कोटींचे हे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिना लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आंबा घाट सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सुभाष बने यांनी दिली. मात्र, याबाबत जिल्हा पोलीस दल आणि राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाने आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी अजूनही धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फक्त छोट्या वाहनांना आंबा घाटातून परवानगी आहे. आंबा घाटात २२ जुलैला मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. दरड हटवण्याचे काम पंधरा दिवस सुरू होते; मात्र, दरड हटवल्यानंतर दोन ठिकाणी अधिक धोकादायक स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यापैकी एका ठिकाणी रस्त्याची एक बाजू पूर्ण खचली ते अधिक धोकादायक आहे.

खचलेल्या अर्धा रस्त्यामध्ये कठडा बांधून डोंगराच्या बाजूला गटारावर स्लॅब टाकून रस्ता वाढवण्यात आला आहे. आणखी एका ठिकाणी डोंगर घसरून तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात गेला आहे. तो भाग पुन्हा कधीही खचण्याची शक्यता आहे. अन्य दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. अवजड वाहनांमुळे खचलेल्या या रस्त्यांचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अवजड वाहतुकीला आंबा घाटातून बंदी घातली आहे.

प्राधिकरणाने आंबा घाटातील या दोन धोकादायक ठिकाणांच्या दुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. याचे काम लवकरच सुरू होणार असून अजून दीड महिन्यांनंतर आंबा घाट सुरू होईल, असा अंदाज प्रकल्प संचालक पंदरकर यांनी सांगितले.