शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंबा घाट सुरू होण्यास अजून लागणार दीड महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून ...

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून रेटिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधण्यात येणार आहे. सुमारे साडेचार कोटींचे हे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिना लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आंबा घाट सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सुभाष बने यांनी दिली. मात्र, याबाबत जिल्हा पोलीस दल आणि राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाने आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी अजूनही धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फक्त छोट्या वाहनांना आंबा घाटातून परवानगी आहे. आंबा घाटात २२ जुलैला मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. दरड हटवण्याचे काम पंधरा दिवस सुरू होते; मात्र, दरड हटवल्यानंतर दोन ठिकाणी अधिक धोकादायक स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यापैकी एका ठिकाणी रस्त्याची एक बाजू पूर्ण खचली ते अधिक धोकादायक आहे.

खचलेल्या अर्धा रस्त्यामध्ये कठडा बांधून डोंगराच्या बाजूला गटारावर स्लॅब टाकून रस्ता वाढवण्यात आला आहे. आणखी एका ठिकाणी डोंगर घसरून तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात गेला आहे. तो भाग पुन्हा कधीही खचण्याची शक्यता आहे. अन्य दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. अवजड वाहनांमुळे खचलेल्या या रस्त्यांचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अवजड वाहतुकीला आंबा घाटातून बंदी घातली आहे.

प्राधिकरणाने आंबा घाटातील या दोन धोकादायक ठिकाणांच्या दुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. याचे काम लवकरच सुरू होणार असून अजून दीड महिन्यांनंतर आंबा घाट सुरू होईल, असा अंदाज प्रकल्प संचालक पंदरकर यांनी सांगितले.