शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आंबा घाटात स्वच्छतागृह आवश्यक

By admin | Updated: August 4, 2015 23:50 IST

युयुत्सू आर्ते : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील समस्या

मार्लेश्वर : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गायमुखाजवळ हजारो पर्यटक थांबतात. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. निदान महिलावर्गासाठी फायबर मोडमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे. घाटमाथ्यावरून कोकणात यायचे असल्यास रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणजे गायमुख आहे. या ठिकाणाहून नयनरम्य निसर्गसौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी प्रत्येक प्रवासी, पर्यटक गायमुखाजवळ थांबतात. या ठिकाणी बारमाही मुबलक पाणी आहे. क्षणभर विश्रांती घेण्यासाठी पर्यटकांचे पाय गायमुखाजवळ रूततात. याठिकाणी मंदिर असून, या देवतेचे मनोभावे दर्शन घेऊन पुढील प्रवास प्रत्येकजण सुरू करतो.राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची सतत ये - जा असते. गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी, दसरा आदी सणांसह, मे महिन्याच्या सुटीमध्ये चाकरमानी गावी परतात. सण व उत्सव कालावधीत गायमुखाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृहाअभावी त्यांची कुचंबना होत आहे. स्वच्छतागृहासाठी पाणीही उपलब्ध आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष केंद्रीत करून फायबर मोडचे किमान एकतरी स्वच्छता उभारण्यात यावे, अशी मागणी आर्ते यांनी केली आहे. आर्ते यांनी केलेल्या मागणीची दखल कधी घेतली जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)