शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घाटात स्वच्छतागृह आवश्यक

By admin | Updated: August 4, 2015 23:50 IST

युयुत्सू आर्ते : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील समस्या

मार्लेश्वर : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गायमुखाजवळ हजारो पर्यटक थांबतात. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. निदान महिलावर्गासाठी फायबर मोडमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे. घाटमाथ्यावरून कोकणात यायचे असल्यास रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणजे गायमुख आहे. या ठिकाणाहून नयनरम्य निसर्गसौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी प्रत्येक प्रवासी, पर्यटक गायमुखाजवळ थांबतात. या ठिकाणी बारमाही मुबलक पाणी आहे. क्षणभर विश्रांती घेण्यासाठी पर्यटकांचे पाय गायमुखाजवळ रूततात. याठिकाणी मंदिर असून, या देवतेचे मनोभावे दर्शन घेऊन पुढील प्रवास प्रत्येकजण सुरू करतो.राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची सतत ये - जा असते. गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी, दसरा आदी सणांसह, मे महिन्याच्या सुटीमध्ये चाकरमानी गावी परतात. सण व उत्सव कालावधीत गायमुखाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृहाअभावी त्यांची कुचंबना होत आहे. स्वच्छतागृहासाठी पाणीही उपलब्ध आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष केंद्रीत करून फायबर मोडचे किमान एकतरी स्वच्छता उभारण्यात यावे, अशी मागणी आर्ते यांनी केली आहे. आर्ते यांनी केलेल्या मागणीची दखल कधी घेतली जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)