शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाई शासनदरबारी

By admin | Updated: April 13, 2017 13:52 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने रक्कम गेली परत

आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. १३ : जनतेकडुन सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सलग दुसऱ्या वषीर्ही सुमारे तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडे वर्ग झाली आहे. गतवर्षी देखील अशाच पध्दतीने रक्कम परत गेली होती.तालुक्यातील समस्त आंबा बागायतदार शेतकर्यांसाठी ११ कोटी ३५ लाख रुपये नुकसान भरपाई पोटी तालुक्याला आले होते. त्यानंतर आणखी पाच कोटी आले अशी एकत्रीत १६ कोटी ३५ लाख रुपये तालुका प्रशासनाकडे जमा झाले होते. त्यानंतर शासनाकडुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवान्ना आपापल्या भरपाईचे धनादेश घेऊन जाण्याबाबत शासकीय पातळीवरुन आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आंबा बागायतदार शेतकरी यांनी आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करुन शासनाकडुनभरपाई स्वीकारली पण त्याचे प्रमाण फारच कमी होते. या कालावधीच केवळ साडेतीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदानाचे वाटप करण्यात आले. तथापी ज्या प्रमाणात हे वाटप व्हायला हवे होते ते झाले नाही. सलग दुसऱ्या वषीर्ही वाटप न झालेली भरपाईची रक्कम पुन्हा शासनाकडे वर्ग झाली आहे. सुमारे तेरा कोटीच्या आसपास रक्कम असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. किचकट प्रक्रिया व कागदपत्रे गोळा करताना येणाऱ्या अडचणी अशी विविध कारणे जनतेच्या उदासीनतेमागील असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील वेळीदेखील काही कोटीची अनुदानाची रक्कम मुदतीत वितरण न झाल्याने शासनाकडे वर्ग झाली होती. यावेळीही तोच अनुभव पुन्हा आला आहे. (प्रतिनिधी)