शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडला प्रशासकही नसल्याने पेच

By admin | Updated: April 3, 2015 00:47 IST

ग्रामस्थांची गैरसोय : ग्रामपंचायतीच्या नैमित्तिक कामांसाठी अधिकारी नाही

मंडणगड : नगर पंचायतीच्या घोषणेने ग्रामपंचायतीची सत्ता संपुष्टात येणार असल्याने ग्रामपंचायतीचा नैमित्तिक कारभार सांभाळण्याचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. याठिकाणी अद्यापही प्रशासक न नेमल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.नगर व ग्रामविकास खात्याच्या १९ मार्च २०१५च्या आदेशाने कारभारात मोठे फेरबदल झाले आहेत. ग्रामपंचायतीचा नैमित्तिक कारभार चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, प्रशासनाकडून अध्यादेशाच्या तेरा दिवसानंतरही प्रशासकीय नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे समस्यांमध्ये दिवसागणिक भर पडत आहे.या संदर्भातील परिस्थिती अशीच राहिल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन व पाणी वाटपाची समस्या गंभीर रुप धारण करणार आहे़ शहरात दररोज हजारो किलो कचरा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी गेली दोन वर्षे ग्रामपंचायतीची कचरागाडी शहरातील विविध भागात फिरते व कचरा गोळा करते. ग्रामपंचायतीकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंड नसल्याने शहराच्या बाहेर माहू गावाच्या हद्दीत कचरा टाकण्याची सोय करण्यात आले होती. याशिवाय गावाबाहेर असलेल्या चिरा खाणीतील खड्ड्यांमध्ये हा कचरा टाकला जात होता.नगरपंचायतीच्या घोषणेनंतर ग्रामस्थांनी चिरेखाणीतील खड्ड्यात गाडीतून गोळा केलेला कचरा टाकण्यास मज्जाव केला आहे. खाणीतील कचऱ्यातील मांस खाण्यासाठी गोळा होणाऱ्या जनावरांमुळे शेतीसही उपद्रव होऊ लागल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांच्या अचानक बदलेल्या पवित्र्यामुळे शहरात गोळा होणारा कचरा तुळशी घाटात बेकायदेशीर टाकला जात आहे. शहराची नळपाणी योजना चाळीस वर्षांपासून कार्यरत असल्याने या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असते.याशिवाय पंप नादुरुस्त होण्याचा धोकाही असतो. बुधवारी सकाळी मुख्य जलवाहिनीत दोष निर्माण झाल्याने शहरातील स्टँड व दुर्गवाडी परिसराला पाणी पुरवठा झालेला नाही व सद्यस्थितीत ग्रामपंचायतीस कोणीही वाली नसल्याने या परिस्थतीत सुधारणेची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.एका अर्थाने हा कालावधी मंडणगड ग्रामपंचायतीसाठी संक्रमणाचा कालावधी म्हणावा लागेल. ग्रामपंचायतीचा नैमित्तिक कारभार चालवण्यासाठी करावे लागणारे खर्च व उद्भवणाऱ्या प्रासंगिक अडचणींचा विचार करता कर्मचारी वर्ग कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली जाणे कठीण वाटत आहे.महसूल प्रशासनाने शहरातील सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे़ पाणी व कचऱ्याची समस्या गंभीर रुप धारण करण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासक नेमणे शक्य नसल्यास विद्यमान सरपंचांना नैमित्तिक कामे मार्गी लावण्यासाठी काळजीवाहू कारभार पाहण्याचे अधिकार देण्याची मागणी पुढे येत आहे़ तहसील कार्यालयात संपर्क साधला असता, तहसीलदार बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. निवासी नायब तहसीलदार कांबळे यांनी माहिती देताना मंत्रालयातील माहिती दिली. प्रशासकीय नियुक्तीचा शासन स्तरावरील आदेश केव्हाही होऊ शकतो.यासाठी तहसील कार्यालय वरिष्ठांच्या प्रतिक्षेत असल्याचे मत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)मूलभूत समस्यांवर उपाय हवेत... मंडणगडला विकासाचे वेध लागले असून, नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरवासियांचे अनेक प्रश्न सुटतील व वर्षानुवर्षे ग्रामीण भागात नोंद होणाऱ्या मंडणगडची नगरामध्ये निर्मिती केली जाणार आहे. अशा माध्यमातून हा विकास सहज शक्य होणार आहे. आता प्रक्रिया राबविण्याचे प्रयत्न सुरू असून गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न करून आता नगरपंचायत निर्मितीसाठीची प्रक्रिया पूर्ण होत आहे.