शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

पहिल्या इयत्तेपासून मुलांना वेगळं करण्याचा

By admin | Updated: February 15, 2016 01:18 IST

घाटमकरंद अनासपुरे : पालपेणे शाळेला आयएसओ मानांकन प्रदान...

शृंगारतळी : प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत शिकणाऱ्यांनीच इतिहास घडवला आहे. ज्यांना कसलीच पार्श्वभूमी नसलेली मोठी माणसे आज समाजात आहेत, ती आली कुठून? याचा विचार करण्याची गरज आहे. आपली शिक्षण व्यवस्था किती गमतीशीर आहे. एकीकडे विनामूल्य शिकणारी जिल्हा परिषदेतील मुले, तर दुसरीकडे वर्षाकाठी लाखभर रुपये भरून खासगी शाळेत शिकणारी मुले ही आयुष्यात एकत्र कशी येतील, हा मूलभूत प्रश्न आहे. त्यांना शाळेच्या पहिल्या इयत्तेपासूनच वेगळे करण्याचा घाट समाजव्यवस्थेत घातलेला आहे. त्यामुळे आपली समाजव्यवस्था चांगली कशी निर्माण होईल? असे प्रतिपादन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळा, पालपेणे नं. ३च्या आयएसओ मानांकन प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मकरंद व शिल्पा अनासपुरे यांच्याहस्ते मुख्याध्यापक मकरंद विचारे व उपशिक्षक प्रदीप पडवळ यांना गौरविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे, विश्वास बेलवलकर, अरविंद पालकर, महादेव पडवेकर, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय टाणकर, दीपक टाणकर, सरपंच उर्मिला महाडिक, प्रकाश शिर्के उपस्थित होते.प्रशासनातून निवृत्त झाल्यानंतर कर्मचारी किंवा अधिकारी प्रशासनाच्या कामकाजाच्या विरोधात बोलतात. मला नेहमी असे वाटते की, या समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना का बोलले जात नाही? आपण या व्यवस्थेला कुठपर्यंत नेले आहे? याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला अधिकारीवर्ग उपस्थित नाही, हे काय नवीन नाही. याच्यावर आम्ही सिनेमासुद्धा केला आहे. आपला देश कागदोपत्री सुजलाम सुफलाम आहे. परदेशातला माणूस आपल्याकडे आला आणि त्याने कागदपत्र पाहिली तर असा देश जगाच्या पाठीवर नाही, असे म्हणेल. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे, असे अनासपुरे म्हणाले.आपण केवळ कागदोपत्री चांगली असलेली माणसे आहोत. मी पण खेड्यात शिकलो आहे. त्याचा मला अभिमान आहे, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. आपण चांगल्या लोकांचे त्यांच्या हयातीत कौतुक करत नाही. मात्र, तो गेल्यानंतर लक्षात येते किती मोठा व्यक्ती होता. यावेळी मुलांसाठी आरओ पाणी शुद्धीकरण यंत्र, ग्रंथालयासाठी पुस्तके व कुपनलिका देण्याचे त्यांनी जाहीर केले. (वार्ताहर)..अन्यथा काहीच घडणार नाहीकाही माणसे स्वत:च्या ध्येयात वेडी झालेली असतात. चांगले काम करणारे अधिकारी, शिक्षक समाज घडवू शकतात, हे सर्वांना माहीत असते, त्यांना पाठबळ देण्याची गरज असावी अन्यथा युगानुयुगे काहीच घडणार नाही, असे अनासपुरे म्हणाले.