शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बिबट्याच्या कातडीच्या तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी अजित चंद्रकांत नातू (, वय ४८, रा. धाकोरा, ता. सावंतवाडी, जि. ...

रत्नागिरी : बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी अजित चंद्रकांत नातू (, वय ४८, रा. धाकोरा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला वनविभागाने धाकोरा येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडे सापडलेली सांबराची दोन शिंगे व कवटीही वनविभागाने ताब्यात घेतली. आरोपीला प्रथमवर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत ३ दिवसांची वन कोठडी दिली आहे.

२० सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली (ता. राजापूर) येथील पेट्रोल पंपावर संशयास्पद स्थितीत आढळलेल्या जयेश बाबी परब (वय २३), दर्शन दयानंद गडेकर (वय २०) आणि दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (वय २२, सर्व रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांना रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला, तसेच बिबट्याच्या कातडीसह दोन मोटारसायकल गाडी तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपींकडून जप्त केले.

या आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर वनविभागामार्फत त्यांची कसून चाैकशी केली असता, बिबटयाची कातडी आरोपी जयेश परब याच्या पिठाच्या गिरणीवर काम करणारा अजित चंद्रकांत नातू (वय ४८ रा. धाकोरा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार रत्नागिरी परिक्षेत्राच्या वनअधिकारी प्रियांका लगड आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी धाकोरा येथे जाऊन अजित नातू याला ताब्यात घेतले. त्यानेही गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडे सांबराची दोन शिंगे व कवटी सापडली. तीही जप्त करण्यात आली आहेत. नातू याच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या कलम ९,३९,५१,५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. या आरोपीला प्रथमवर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता सरकारी वकील ओंकार गांगण यांनी सरकारची (वनविभागाची) बाजू सक्षमपणे न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे न्यायालयाने नातू याला २५ सप्टेंबरपर्यंत वन कोठडी दिली आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, राजापूरचे वनपाल स. व. घाटगे, संगमेश्वरचे तो.र.मुल्ला, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक कोले सागर पताडे, साखरपाचे न्हा.नु.गावडे, आरवलीचे आकाश कडूकर, लांजाचे विक्रम कुंभार, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर, राहुल गुंठे, सूरज तेली यांनी केली.