शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

डाकसेवकांचा संप सुरुच

By admin | Updated: March 18, 2015 23:58 IST

शासन उदासीन : विविध मार्गांनी असंतोष व्यक्त

चिपळूण : अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने १० मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप गेले ९ दिवस सुरु आहे. विविध प्रलंबित मागण्या या डाकसेवक संघटनेने शासनासमोर ठेवल्या आहेत. परंतु, शासनाने अद्यापही त्यावर विचार न केल्याने नऊ दिवसानंतरही हा संप सुरूच आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून १५० वर्षे सरकारने आपला केवळ वापर करुन घेतला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या जनतेसाठी डाकसेवक हा खऱ्या अर्थाने देवदूत असतो. ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता तो संदेशवाहकाचे काम प्रामाणिकपणे करतो. स्वातंत्र्यानंतर आजही जेथे दळणवळणाच्या मूलभूत सुविधा नाहीत अशा ठिकाणी डाकसेवक कार्यरत असतो. मात्र, आजपर्यंत कोणत्याही सरकारला त्याची दया येत नाही. याबद्दल संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.संघटनेने ग्रामीण डाकसेवकांसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची कमिटी नेमावी, ग्रामीण डाकसेवकांनाही टपाल खात्यात सामावून घ्यावे, केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवासुविधा द्याव्यात, टपाल खात्याच्या खासगीकरणाचा धातलेला घाट बंद करावा अशा प्रमुख मागण्या आहेत. संपूर्ण देशभर हा संप ७२ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ४५ ते ५० टक्के संप यशस्वी झाला आहे. या संपाला ऊर्जा मिळावी, म्हणून अनेक ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, धरणे, उपोषणे असे विविध कार्यक्रम सुरु आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामीण डाकसेवकांनी भूलथापांना, अफवांना बळी न पडता केंद्रीय शाखेचा आदेश येईपर्यंत हा संप सुरुच ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व गोवा प्रांताचे अध्यक्ष व अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव डी. एस. सागवेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) अन्य शाखांनी कामबंद करावेगेले ८ दिवस संप मिटवण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. शासनाने लक्ष दिले नाही, तर हा संप चिघळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मिळणाऱ्या सर्व सेवा ठप्प होणार आहेत. लाईट बिल, फोन बिल, सेव्हिंग, आरडी, पोस्ट विमा, पत्राचा बटवडा, दहावी, बारावीचे पेपर गठ्ठे आदी कामे बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. असे असताना जिल्हास्तरीय अधिकारी खोटी माहिती पसरवत आहेत ही खेदाची बाब आहे. जिल्ह्यातील ५० टक्के डाकघर शाखा बंद आहेत. इतर शाखांनीही काम बंद ठेवून संपात सहभागी व्हावे, असे आवाहन सागवेकर यांनी केले आहे.