शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

जिल्हा प्रशासनात महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आधी पाच महिला अधिकारी कार्यरत होत्या. त्यापैकी दोघींची ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आधी पाच महिला अधिकारी कार्यरत होत्या. त्यापैकी दोघींची बदली झाली असून, तीन नव्या महिला अधिकाऱ्यांची भर पडली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे, कोकण रेल्वे भूसंपादनच्या ऐश्वर्या काळुसे, भूसंपादन विभागाच्या सविता लष्करे आणि रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांच्या एकाचवेळी रत्नागिरीत नियुक्ती झाल्या. त्याआधी जिल्हा प्रकल्प अधिकारी (नगरपंचायत विभाग) शिल्पा नाईक, तसेच महसूल विभागाच्या तहसीलदार वैशाली पाटील अशा एकूण पाच महिला अधिकारी कार्यरत होत्या.

काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांची इतरत्र बदली झाली असून, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे यांचीही प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बदलीने नियुक्त झालेल्या रोहिणी रजपूत यांची पुन्हा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या या पदावर नियुक्ती झाली आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर तेजस्विनी पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांच्या प्रशासनात कोकण रेल्वे भूसंपादनच्या ऐश्वर्या काळुसे, भूसंपादन विभागाच्या सविता लष्करे आणि रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील अशा सहा महिला अधिकारी स्वतंत्र विभाग सांभाळत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खऱ्या अर्थाने महिलाराज आले असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जिल्हा परिषदेतही महिलाराज

जिल्हा परिषदेची धुरा मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड या सांभाळत आहेत. त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, तसेच माध्यमिकबरोबरच प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे या महिला अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत.