शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

शिवसेनेच्या अतिरेकी भूमिकेनेच महायुती तुटली

By admin | Updated: October 4, 2014 23:56 IST

राज्यातील आघाडी सरकारने केवळ विकासाची स्वप्नेच

नितीन गडकरी : राज्यातील आघाडी सरकारने केवळ विकासाची स्वप्नेच दाखविल्याची टीका रत्नागिरी : भाजपने शिवसेनेबरोबर २५ वर्षे युती जपली. अनेक अडचणी आल्या तरी भाजपने सामंजस्याची भूमिका घेतली. भांडणे टाळली; मात्र यावेळी १५१ पेक्षा एकही जागा कमी करणार नाही यावर शिवसेना अडून बसली. मुख्यमंत्री सेनेचाच होणार अशी घोषणा करून ज्याचे आमदार अधिक निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री या ठरलेल्या संकेताला हरताळ फासला. शिवसेनेच्या या अतिरेकी भूमिकेमुळेच आम्हाला युती तोडण्यावाचून पर्याय उरला नाही, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात भाजपचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांच्या प्रचारसभेत गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप उमेदवार माने, माधवी माने, भाजपचे राजापूरचे उमेदवार संजय यादवराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, इब्राहिम खान, गोव्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, जनुभाऊ काळे, जे. पी. जाधव, आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील आघाडीच्या सरकारने विकासाची स्वप्ने दाखवीत राज्याचा सत्यानाश केला. राज्याचा विकास काही झाला नाही; मात्र कॉँग्रेस नेते, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या कार्यकर्त्यांचाच विकास झाल्याचा आरोप गडकरी यांनी केला. राज्यातही घराणेशाहीला ऊत आला आहे. मोदी यांनी सत्तेत येताच खासदाराचा मुलगा खासदार होणार नाही, अशी घोषणा करून घराणेशाहीलाच विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी) (प्रतिनिधी) रत्नागिरी मतदारसंघातील पक्षबदलूपणाच्या वृत्तीवर गडकरी यांनी कडाडून टीका केली. राष्ट्रवादीने सर्वकाही देऊनही एका रात्रीत पक्षाचे कपडे बदलणाऱ्या पक्षबदलूंना जनता निवडून देणार काय, असे कार्यकर्त्यांनी जनतेला विचारावे, असेही गडकरी म्हणाले.