शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महावितरणला २ कोटी ९५ लाखांचा महसूल

By admin | Updated: January 15, 2016 00:24 IST

आॅनलाईन सुविधा : जिल्ह्यातील २० हजार ४०३ ग्राहकांकडून सुविधेचा लाभ; घरबसल्या वीजबिल भरणा

रत्नागिरी : आॅनलाईन सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरणे सोपे झाले आहे. दिवसेंदिवस आॅनलाईनकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह््यातील २० हजार ४०३ ग्राहकांनी या आॅनलाईन सुविधेचा लाभ घेतला असून, यातून महावितरणला २ कोटी ९५ लाख २३ हजार ९८० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.वीजबिल भरण्यासाठी बँका, पोस्ट कार्यालये तसेच पतसंस्थांमध्ये सुविधा उपलब्ध आहे. महावितरण कार्यालयातही वीजबिल भरणा केंद्र सुरू आहे. मात्र, संबंधित ठिकाणी गर्दीमुळे ग्राहकांना रांगेत बराचवेळ उभे राहावे लागते. महावितरणने स्वयंचलित वीजबिल केंद्रही सुरू केले आहे. मात्र, त्याठिकाणी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. सध्या घरोघरी स्मार्टफोन उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध होते. त्यामुळे संगणक, मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करत ग्राहक घरबसल्या वीजबिल भरणा करत आहेत.चिपळूण विभागातून ५ हजार ७५७ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ६८ लाख ३६ हजार ३४० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. खेड विभागातून ३ हजार ४०० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ६७ लाख ५९ हजार ६६० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर रत्नागिरी विभागातील ११ हजार २४६ ग्राहकांनी या आॅनलाईन सुविधेचा लाभ घेतल्याने १ कोटी ५९ लाख २७ हजार ९८० रूपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. सर्वाधिक महसूल हा रत्नागिरी विभागातून प्राप्त झाला आहे. चिपळूण शहरी भागातून २१६८ ग्राहकांनी ३१ लाख ९५ हजार ४३० रूपये तर ग्रामीणमधील ८३२ ग्राहकांनी १० लाख ६१ हजार ९७० रुपये, गुहागर येथील १९३५ ग्राहकांनी १५ लाख ५२ हजार ९९० रुपये, सावर्डेतील ८२२ ग्राहकांनी आॅनलाईन बील भरणा केल्यामुळे १० लाख २५ हजार ९५० रूपयांचा महसूल चिपळूण विभागातून प्राप्त झाला आहे.खेड विभागातील दापोली १ मधील ७०१ ग्राहकांनी ११ लाख ८३ हजार ५३० रूपये, खेड येथील ५७७ ग्राहकांनी १० लाख २४ हजार २९० रुपये, मंडणगड येथील ५९४ ग्राहकांनी ५ लाख ७८ हजार ७९० रुपये, दापोली २ मधील ५६० ग्राहकांनी १३ लाख ३१ हजार ३२० रुपये, लोटेतील ९६८ ग्राहकांनी आॅनलाईन बील भरल्यामुळे २६ लाख ४१ हजार ७३० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. रत्नागिरी विभागातील देवरूख येथील ६३० ग्राहकांनी ७ लाख ६१ हजार ६० रुपये, रत्नागिरी ग्रामीण १ मधील १६११ ग्राहकांनी २१ लाख १३ हजार ६५० रुपये, ग्रामीण २ मधील ५२६ ग्राहकांनी १९ लाख ४१ हजार ५५० रुपये, लांजा येथील ५८२ ग्राहकांनी ९ लाख ८८ हजार १९० रुपये, राजापूर मधील ३०२२ ग्राहकांनी १९ लाख ८३ हजार ९० रुपये, राजापूर २ मधील ७८५ ग्राहकांनी ५ लाख ८२ हजार ८० रुपये तर संगमेश्वर येथील ६०४ ग्राहकांकडून ८ लाख २३ हजार २६० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)