शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ‘महावितरण’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला असून, वादळ होऊन तीन दिवस उलटले तरी राजापूर तालुक्याच्या काही ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला असून, वादळ होऊन तीन दिवस उलटले तरी राजापूर तालुक्याच्या काही भागांत अजूनही ठप्प झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. महावितरणकडून हा पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही भागांत अंधाराचे साम्राज्य असून, विजेवर अवलंबून असलेली सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात अद्यापही २५ ते ३० टक्के ग्राहक अंधारात आहेत.

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना बसला, तसा तालुक्याच्या अन्य भागांतही वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विद्युत खांब, वीजवाहिन्या कोसळून महावितरणची वितरण व्यवस्था कोलमडून पडली. मुख्य वाहिनी ३३ केव्हीवरचाही वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मुख्य वाहिनीतील अडथळे दूर करून ती पूर्ववत सुरू करण्यात आली असली तरी तालुक्यात अनेक भागांत कोसळून पडलेले खांब, वाहिन्या जोडण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. तालुक्यात आंबोळगड, जैतापूर, दळे, माडबन, साखरीनाटे, धाऊलवल्ली, कशेळी, धारतळे, ससाळे, शिळ, पाचल परिसरांतील काही भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे.

ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काम संथगतीने सुरू असून, महावितरणकडून सर्व ठिकाणी आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत शर्थीचे प्रयत्न करून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.