शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ‘महावितरण’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला असून, वादळ होऊन तीन दिवस उलटले तरी राजापूर तालुक्याच्या काही ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला असून, वादळ होऊन तीन दिवस उलटले तरी राजापूर तालुक्याच्या काही भागांत अजूनही ठप्प झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. महावितरणकडून हा पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही भागांत अंधाराचे साम्राज्य असून, विजेवर अवलंबून असलेली सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात अद्यापही २५ ते ३० टक्के ग्राहक अंधारात आहेत.

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना बसला, तसा तालुक्याच्या अन्य भागांतही वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विद्युत खांब, वीजवाहिन्या कोसळून महावितरणची वितरण व्यवस्था कोलमडून पडली. मुख्य वाहिनी ३३ केव्हीवरचाही वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मुख्य वाहिनीतील अडथळे दूर करून ती पूर्ववत सुरू करण्यात आली असली तरी तालुक्यात अनेक भागांत कोसळून पडलेले खांब, वाहिन्या जोडण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. तालुक्यात आंबोळगड, जैतापूर, दळे, माडबन, साखरीनाटे, धाऊलवल्ली, कशेळी, धारतळे, ससाळे, शिळ, पाचल परिसरांतील काही भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे.

ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काम संथगतीने सुरू असून, महावितरणकडून सर्व ठिकाणी आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत शर्थीचे प्रयत्न करून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.