शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: July 16, 2014 22:41 IST

विजेचा खेळखंडोबा : सेवेतील व्यत्ययामुळे ग्राहकांचा संताप

चिपळूण : ऐन पावसाळ्यात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. उलट आॅनलाईन तक्रार निवारण सेवा ग्राहकांच्या माथी मारुन ग्राहकांना त्रास देण्याच्या भूमिकेचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध करीत ही सेवा तत्काळ बंद करा, अशी मागणी आज (बुधवारी) केली. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे ग्राहकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरणच्या सुलतानशाही कारभाराला ग्राहक कंटाळले आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचे रोजे सुरु आहेत. त्यातच पावसाळी वातावरण असल्याने विजेची नितांत गरज असते. परंतु, गेले चार दिवस दिवसातून १० ते १२ वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. काही भागात रात्रीही वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. या बेबंदशाही कारभाराला कंटाळून अखेर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला. महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी आॅनलाईन तक्रार निवारण सेवा सुरु केली आहे. हा द्रविडीप्राणायम कारभार ग्राहकाच्या हिताचा नाही. त्यामुळे सेवा मिळण्याऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने आज सकाळी माजी सभापती शौकत मुकादम, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय ओतारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, मनसेचे शहराध्यक्ष कपिल शिर्के, वैभव वीरकर, इनायत मुकादम, फैसल पिलपिले, प्रफुल्ल पिसे, साधना कात्रे, वीणा कानडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना भंडावून सोडले. कार्यकर्त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महावितरणच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. परंतु, महावितरण कंपनी ग्राहकांकडून दामदुप्पट देयके जमा करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपनगराध्यक्ष शाह यांनी आवळेकर यांना निवेदन देऊन आॅनलाईन तक्रार निवारण सेवा तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ही सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरणारी आणि तापदायक आहे. तक्रार निवारणासाठी असलेला टोल फ्री क्रमांक मुंबई, पुणे येथील आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरात शॉर्टसर्किट झाले तर तक्रार मुंबईत करायची काय? हा अजब कारभार वीज ग्राहकांना सोयीचा न होता मनस्ताप देणारा ठरला आहे. तक्रारीनंतर वीज पुरवठा सुरळीत होण्यास १६ ते १७ तास कालावधी लागतो. त्यामुळे ही व्यवस्था बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शाह यांनी दिला. (प्रतिनिधी)