शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: July 16, 2014 22:41 IST

विजेचा खेळखंडोबा : सेवेतील व्यत्ययामुळे ग्राहकांचा संताप

चिपळूण : ऐन पावसाळ्यात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. उलट आॅनलाईन तक्रार निवारण सेवा ग्राहकांच्या माथी मारुन ग्राहकांना त्रास देण्याच्या भूमिकेचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध करीत ही सेवा तत्काळ बंद करा, अशी मागणी आज (बुधवारी) केली. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे ग्राहकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरणच्या सुलतानशाही कारभाराला ग्राहक कंटाळले आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचे रोजे सुरु आहेत. त्यातच पावसाळी वातावरण असल्याने विजेची नितांत गरज असते. परंतु, गेले चार दिवस दिवसातून १० ते १२ वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. काही भागात रात्रीही वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. या बेबंदशाही कारभाराला कंटाळून अखेर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला. महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी आॅनलाईन तक्रार निवारण सेवा सुरु केली आहे. हा द्रविडीप्राणायम कारभार ग्राहकाच्या हिताचा नाही. त्यामुळे सेवा मिळण्याऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने आज सकाळी माजी सभापती शौकत मुकादम, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय ओतारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, मनसेचे शहराध्यक्ष कपिल शिर्के, वैभव वीरकर, इनायत मुकादम, फैसल पिलपिले, प्रफुल्ल पिसे, साधना कात्रे, वीणा कानडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना भंडावून सोडले. कार्यकर्त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महावितरणच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. परंतु, महावितरण कंपनी ग्राहकांकडून दामदुप्पट देयके जमा करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपनगराध्यक्ष शाह यांनी आवळेकर यांना निवेदन देऊन आॅनलाईन तक्रार निवारण सेवा तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ही सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरणारी आणि तापदायक आहे. तक्रार निवारणासाठी असलेला टोल फ्री क्रमांक मुंबई, पुणे येथील आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरात शॉर्टसर्किट झाले तर तक्रार मुंबईत करायची काय? हा अजब कारभार वीज ग्राहकांना सोयीचा न होता मनस्ताप देणारा ठरला आहे. तक्रारीनंतर वीज पुरवठा सुरळीत होण्यास १६ ते १७ तास कालावधी लागतो. त्यामुळे ही व्यवस्था बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शाह यांनी दिला. (प्रतिनिधी)