शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: July 16, 2014 22:41 IST

विजेचा खेळखंडोबा : सेवेतील व्यत्ययामुळे ग्राहकांचा संताप

चिपळूण : ऐन पावसाळ्यात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. उलट आॅनलाईन तक्रार निवारण सेवा ग्राहकांच्या माथी मारुन ग्राहकांना त्रास देण्याच्या भूमिकेचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध करीत ही सेवा तत्काळ बंद करा, अशी मागणी आज (बुधवारी) केली. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे ग्राहकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरणच्या सुलतानशाही कारभाराला ग्राहक कंटाळले आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचे रोजे सुरु आहेत. त्यातच पावसाळी वातावरण असल्याने विजेची नितांत गरज असते. परंतु, गेले चार दिवस दिवसातून १० ते १२ वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. काही भागात रात्रीही वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. या बेबंदशाही कारभाराला कंटाळून अखेर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला. महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी आॅनलाईन तक्रार निवारण सेवा सुरु केली आहे. हा द्रविडीप्राणायम कारभार ग्राहकाच्या हिताचा नाही. त्यामुळे सेवा मिळण्याऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने आज सकाळी माजी सभापती शौकत मुकादम, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय ओतारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, मनसेचे शहराध्यक्ष कपिल शिर्के, वैभव वीरकर, इनायत मुकादम, फैसल पिलपिले, प्रफुल्ल पिसे, साधना कात्रे, वीणा कानडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना भंडावून सोडले. कार्यकर्त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महावितरणच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. परंतु, महावितरण कंपनी ग्राहकांकडून दामदुप्पट देयके जमा करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपनगराध्यक्ष शाह यांनी आवळेकर यांना निवेदन देऊन आॅनलाईन तक्रार निवारण सेवा तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ही सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरणारी आणि तापदायक आहे. तक्रार निवारणासाठी असलेला टोल फ्री क्रमांक मुंबई, पुणे येथील आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरात शॉर्टसर्किट झाले तर तक्रार मुंबईत करायची काय? हा अजब कारभार वीज ग्राहकांना सोयीचा न होता मनस्ताप देणारा ठरला आहे. तक्रारीनंतर वीज पुरवठा सुरळीत होण्यास १६ ते १७ तास कालावधी लागतो. त्यामुळे ही व्यवस्था बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शाह यांनी दिला. (प्रतिनिधी)