शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

मग्रारोहयो नव्हे मरेगा; तीव्र संताप

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

आराखडा नामंजूर : २१३ कोटींच्या आराखड्याला मात्र मंजुरी

रत्नागिरी : मग्रारोहयो नव्हे मरेगा, अशी जोरदार टीका करुन ज्या यंत्रणेने काम केलेले नाही त्या यंत्रणेविरुध्द कारवाई प्रस्तावित करावी, असा ठराव आजच्या जिल्हा परिषदेच्या खास सभेत मंजूर केला़ तसेच केवळ ग्रामपंचायत यंत्रणेच्या २१३ कोटींचा आराखड्याला मंजूरी देत ४८ कोटींच्या शासकीय यंत्रणेच्या कामांचा आराखडा नामंजूर करण्यात आला़ यापूर्वीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०१५-१६च्या आराखड्याला मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सभा स्थगित करण्यात आली होती़ त्यानंतर ही खास सभा जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली मग्रारोहयोच्या आराखड्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती़ आजच्या खास सभेच्या सुरुवातीला मग्रारोहयोचे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सदस्य उदय बने, भगवान घाडगे, राजेश मुकादम, सदस्या रचना महाडिक यांनी आक्षेप घेतला़ याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आजच्या सभेबाबत जिल्हा प्रशासनाशी चार वेळा संपर्क साधल्याचे सभागृहात स्पष्ट केले आहे. आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या सभेत शासन स्तरावरील एकही अधिकारी उपस्थित नव्हता़ त्याबद्दल सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्या-त्या यंत्रणेच्या कामाबाबत विचारणा केल्यास उत्तरे कोण देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ त्यामुळे शासन स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचा अपमान करण्यात आला आहे़ अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे़ त्यांच्याकडून जिल्हा परिषदेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. शासन स्तरावरील अधिकाऱ्यांनी अघोषित, असहकार पुकारलेला आहे, असा आरोप सदस्यांनी केला़ यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी मग्रारोहयोच्या कामांसाठी काही ग्रामपंचायतींची मॉडेल ग्रामपंचायती म्हणून निवड केली होती़ या ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे अधिकारी गेले वर्षभर फिरकलेच नाहीत़, असा आरोप सदस्यांनी केला़ सन २०१३-१४ चा ८०८ कोटी रुपयांचा आराखडा असतानाही केवळ ५ कोटी रुपये खर्च झालेला आहे़ त्यामुळे या योजनेचा एक टक्काही खर्च झालेला नाही़तसेच दापोली, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये वर्षभरात या योजनेचा एकही पैसा खर्च झालेला नसल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला़ दरम्यान, या योजनेचा विषय आता जिल्हा परिषद वर्तुळात गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)दि़ १ डिसेंबरपर्यंत मग्रारोहयोचा सन २०१५-१६च्या वार्षिक आराखड्याला मंजूरी देऊन तो ३१ डिसेंबर, २०१४ पर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक होते़ तरीही जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी सभा न घेतल्याने अखेर जिल्हा परिषदेने आजची खास सभा आयोजित केली होती़ ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे़ तरीही जिल्हा प्रशासनाकडून या मग्रारोहयोचे प्रमुख अनुपस्थित राहिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला़ या सभेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नायब तहसीलदार उपस्थित होते़ ते काहीही उत्तर देऊ शकले नाही़ मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी जिल्हा परिषदेतील कक्षासाठी एकही पैसा देण्यात आलेला नाही़ या विषयीही सभागृहात जोरदार चर्चा झाली़अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव.तीन तालुके एकही रुपया खर्चाविना.मॉडेल गावात अधिकारी फिरकेच नाहीत.सन २०१३-१४चा आराखडा ८०८ कोटींचा अन् खर्च केवळ पाच कोटींचा. योजनेचा एक टक्काही खर्च नाही.