शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

मग्रारोहयो नव्हे मरेगा; तीव्र संताप

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

आराखडा नामंजूर : २१३ कोटींच्या आराखड्याला मात्र मंजुरी

रत्नागिरी : मग्रारोहयो नव्हे मरेगा, अशी जोरदार टीका करुन ज्या यंत्रणेने काम केलेले नाही त्या यंत्रणेविरुध्द कारवाई प्रस्तावित करावी, असा ठराव आजच्या जिल्हा परिषदेच्या खास सभेत मंजूर केला़ तसेच केवळ ग्रामपंचायत यंत्रणेच्या २१३ कोटींचा आराखड्याला मंजूरी देत ४८ कोटींच्या शासकीय यंत्रणेच्या कामांचा आराखडा नामंजूर करण्यात आला़ यापूर्वीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०१५-१६च्या आराखड्याला मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सभा स्थगित करण्यात आली होती़ त्यानंतर ही खास सभा जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली मग्रारोहयोच्या आराखड्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती़ आजच्या खास सभेच्या सुरुवातीला मग्रारोहयोचे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सदस्य उदय बने, भगवान घाडगे, राजेश मुकादम, सदस्या रचना महाडिक यांनी आक्षेप घेतला़ याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आजच्या सभेबाबत जिल्हा प्रशासनाशी चार वेळा संपर्क साधल्याचे सभागृहात स्पष्ट केले आहे. आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या सभेत शासन स्तरावरील एकही अधिकारी उपस्थित नव्हता़ त्याबद्दल सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्या-त्या यंत्रणेच्या कामाबाबत विचारणा केल्यास उत्तरे कोण देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ त्यामुळे शासन स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचा अपमान करण्यात आला आहे़ अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे़ त्यांच्याकडून जिल्हा परिषदेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. शासन स्तरावरील अधिकाऱ्यांनी अघोषित, असहकार पुकारलेला आहे, असा आरोप सदस्यांनी केला़ यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी मग्रारोहयोच्या कामांसाठी काही ग्रामपंचायतींची मॉडेल ग्रामपंचायती म्हणून निवड केली होती़ या ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे अधिकारी गेले वर्षभर फिरकलेच नाहीत़, असा आरोप सदस्यांनी केला़ सन २०१३-१४ चा ८०८ कोटी रुपयांचा आराखडा असतानाही केवळ ५ कोटी रुपये खर्च झालेला आहे़ त्यामुळे या योजनेचा एक टक्काही खर्च झालेला नाही़तसेच दापोली, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये वर्षभरात या योजनेचा एकही पैसा खर्च झालेला नसल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला़ दरम्यान, या योजनेचा विषय आता जिल्हा परिषद वर्तुळात गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)दि़ १ डिसेंबरपर्यंत मग्रारोहयोचा सन २०१५-१६च्या वार्षिक आराखड्याला मंजूरी देऊन तो ३१ डिसेंबर, २०१४ पर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक होते़ तरीही जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी सभा न घेतल्याने अखेर जिल्हा परिषदेने आजची खास सभा आयोजित केली होती़ ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे़ तरीही जिल्हा प्रशासनाकडून या मग्रारोहयोचे प्रमुख अनुपस्थित राहिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला़ या सभेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नायब तहसीलदार उपस्थित होते़ ते काहीही उत्तर देऊ शकले नाही़ मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी जिल्हा परिषदेतील कक्षासाठी एकही पैसा देण्यात आलेला नाही़ या विषयीही सभागृहात जोरदार चर्चा झाली़अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव.तीन तालुके एकही रुपया खर्चाविना.मॉडेल गावात अधिकारी फिरकेच नाहीत.सन २०१३-१४चा आराखडा ८०८ कोटींचा अन् खर्च केवळ पाच कोटींचा. योजनेचा एक टक्काही खर्च नाही.