शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

हरवली पाखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

संत ज्ञानेश्वरांनी स्वतःला कोंडून घेतलं त्याचं कारण वेगळं होतं. आज आपल्या सर्वांवरही स्वतःला घरात कोंडून घेण्याची ...

संत ज्ञानेश्वरांनी स्वतःला कोंडून घेतलं त्याचं कारण वेगळं होतं. आज आपल्या सर्वांवरही स्वतःला घरात कोंडून घेण्याची वेळ आलीय त्याच कारणही खूप वेगळं आहे. एका महाकाय पण डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूंनी ही परिस्थिती निर्माण केलीय. आणि या जीवघेण्या विषाणूंचं नाव आहे ‘कोरोना’. कोरोना हा एक असा विषाणू ज्याने सगळ्या जगावर राज्य केलंय, जगातलं कोणतंच राष्ट्र, कोणताच देश या कोरोनाला हरवू शकला नाही, जगभर थैमान घालणाऱ्या या विषाणूने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. डॉक्टर जेव्हा हतबल होऊन रुग्णाला वाचवण्यासाठी देवाचा हवाला देतात त्या देवाचे दार सुद्धा कोरोनाने बंद केले आहेत. आकाशाला गवसणी घालणाऱ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा कोरोनापुढे हात टेकले आहेत. संपूर्ण जग दुःखाच्या छायेत वावरत आहे, रक्ताची नाती दुरावली आहेत. या कोरोनाने आजपर्यंत इतके बळी घेतले आहेत़ त्यात काही मुलं पोरकी झाली, काहींच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले काही भाऊ बहीण कायमचे दुरावले. कोणाची पत्नी गेली तर कोणाचं सौभाग्य हरवलं. या कोरोनाने माणसामाणसात दरी निर्माण केली, दुरावा निर्माण केला.

हाच दुरावा आज शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात निर्माण झालाय. या कोरोनाने विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर केलंय. विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडलीय. शाळा म्हटली की एक प्रेमाचं, आपुलकीचं अतूट नातं जे आई आणि मूल यांच्यात असतं तेच नातं विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्यात आहे. पण त्या नात्यात दुरावा आलाय तो कोरोनामुळे. एप्रिलच्या वार्षिक परीक्षेनंतर चिमुकल्या पाखरांना वेध लागतात ते मे महिन्याच्या सुट्टीचे. आंबे, करवंद, जांभळं शोधत डोंगरातून , उन्हातान्हातून हिंडायचं, विहिरीत थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबायचं, पोहायचं, मामाच्या गावाला भाच्यांबरोबर गोट्या , लगोरी, क्रिकेट खेळण्याची स्वप्न पाहणारी ही चिमुकली आज चार भिंतीत कोंडली गेली.

पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चातक पक्ष्यासारखी शाळा विद्यार्थ्यांची व विद्यार्थी शाळेची वाट पाहत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान देणे किंवा अध्यापन करणे ही शिक्षकांसाठी खरं तर एक कसोटीच होती. कारण ऑनलाईन शिक्षण घेताना देताना अनंत अडचणी विद्यार्थ्यांना शिक्षकांना येत होत्या परंतु प्रत्येक अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करण्याचे महान कार्य आजच्या महामारीच्या काळातही आपला शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

या ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कितपत प्रतिसाद देत आहेत ही गोष्ट निराळी. कारण आपल्या बाईंना, गुरुजींना वर्गात प्रत्यक्ष शिकवताना पाहून, कवितेच्या चालीवर नाचताना पाहून जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो तो आनंद या कृत्रिम शिक्षणातून नाही दिसत. शाळेत दररोज घेतल्या जाणाऱ्या परिपाठातून विविध संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये आपसूकच रुजवली जायची पण कोरोनामुळे केलेल्या संस्कारांचा मुलांना विसरच पडला आहे. सकाळच्या घणघणणाऱ्या शाळेच्या घंटेनी परिसरातील शांतता लोप पावायची आणि धावतपळत शाळेत येणाऱ्या चिमणी पाखरांच्या किलबिलाटानी शाळा गजबजून जायची पण, पण आज शाळेत गेलो तरी एक भयाण शांतता वाटते. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी सुट्टी आता कोणालाच नकोय. हातात पाटी पुस्तक घेऊन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज आई बाबांबरोबर हातात काठी घेऊन जनावरं राखताना पाहून मन हेलावून जातं.

असं म्हणतात की, प्रत्येक गोष्टीला अंत आहे मग या ‘कोरोनाचा’ अंत कधी होणार? वर्षभर घरी राहून कंटाळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत कधी येणार? या डोळ्यांना आतुरता आहे, आस आहे ती विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळा पाहण्याची़

हे ईश्वरा ,तुझ्याच रूपात आम्ही या चिमुकल्यांना पाहत असतो. म्हणूनच हात जोडून तुजला विनंती करतो ‘ लवकरात लवकर या कोरोनाचा नायनाट कर आणि आमच्या विद्यार्थीरूपी फुलांनी शाळेचा मळा बहरू दे.’

- सविता राजेश माळी

प्राथमिक शिक्षिका, लांजा