शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे ...

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुना प्रकल्पाकडे जिल्ह्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जाते. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून, या धरणात पाण्याचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. मात्र, कालव्याची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने परिसरातील शेतकरी धरण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून कालव्याच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे डाव्या व उजव्या कालव्यांची कामे रखडली आहेत. मागील वर्षी प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती करता न आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सांगूनही दखल घेतलेली नाही.

पूर्वी या कालव्याचे काम ओपन कालवा पध्दतीने करण्यात येणार होते. मात्र, आता या कामात बदल करून बंदिस्त पाईपद्वारे करण्यात येत आहे. या कालव्याचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूने काम सुरू आहे. नियोजित मार्गातून पाईपलाईन टाकण्यासाठी जमिनीचे खोदकाम सुरू आहे. मागील वर्षी पाईपलाईन टाकताना खोदण्यात आलेली माती तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. खोदकाम करताना सापडलेले मोठ-मोठे दगड न उचलता ते शेतकऱ्यांच्या शेतातच ठेवण्यात आले. तसेच खोदलेले चर व्यवस्थित न भरल्याने त्यातून वाहून गेलेली माती इतरत्र शेतीत पसरली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बऱ्याच ठिकाणी खोदकाम करताना शेतकऱ्यांच्या बागायती व कुंपणाचेही नुकसान झालेले आहे. आंबा-काजू बागायतींचे मागणी करूनही अद्याप मूल्यांकन करण्यात आलेले नाही. मूल्यांकनच झाले नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.