शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे ...

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुना प्रकल्पाकडे जिल्ह्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जाते. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून, या धरणात पाण्याचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. मात्र, कालव्याची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने परिसरातील शेतकरी धरण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून कालव्याच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे डाव्या व उजव्या कालव्यांची कामे रखडली आहेत. मागील वर्षी प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती करता न आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सांगूनही दखल घेतलेली नाही.

पूर्वी या कालव्याचे काम ओपन कालवा पध्दतीने करण्यात येणार होते. मात्र, आता या कामात बदल करून बंदिस्त पाईपद्वारे करण्यात येत आहे. या कालव्याचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूने काम सुरू आहे. नियोजित मार्गातून पाईपलाईन टाकण्यासाठी जमिनीचे खोदकाम सुरू आहे. मागील वर्षी पाईपलाईन टाकताना खोदण्यात आलेली माती तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. खोदकाम करताना सापडलेले मोठ-मोठे दगड न उचलता ते शेतकऱ्यांच्या शेतातच ठेवण्यात आले. तसेच खोदलेले चर व्यवस्थित न भरल्याने त्यातून वाहून गेलेली माती इतरत्र शेतीत पसरली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बऱ्याच ठिकाणी खोदकाम करताना शेतकऱ्यांच्या बागायती व कुंपणाचेही नुकसान झालेले आहे. आंबा-काजू बागायतींचे मागणी करूनही अद्याप मूल्यांकन करण्यात आलेले नाही. मूल्यांकनच झाले नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.