शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाने आगार तोट्यात

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे

विनोद पवार - राजापूर -गेल्या काही महिन्यांपासून राजापूर एस. टी. आगारातील अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणताही विचार न करता तालुक्यातील अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये अचानक बदल करण्यात येतो. त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. राजापूर एस. टी. आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे वळता दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगारातील अधिकाऱ्यांनी अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केले. त्यामुळे प्रवासी एस. टी. बसने प्रवास करणे टाळत आहेत. राजापूर आगारातून सुटणारी राजापूर-हातदे गाडी अचानकपणे कोंड्येपर्यंत नेण्यात आल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, शिवाय वेळेचाही अपव्यय होत आहे.समाजात आपली पाठ थोपटली जावी, यासाठीच एखाद-दुसऱ्याने गाडीची मागणी केली तर येथील अधिकारी ती मागणी पूर्ण करतात, असा आरोप आता वाहक-चालकांमधूनच करण्यात येत आहे. मात्र, ती मागणी पूर्ण करताना कोणत्याही प्रकारे भारमानाचा विचार करण्यात येत नसल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राजापूर आगारातील अनेक गाड्या फक्त डिझेल जाळण्याचेच काम करत आहेत. नव्याने उपलब्ध करून दिलेल्या मार्गावर किती भारमान आहे, याचा विचार केला जात नाही. वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे प्रवासीदेखील खासगी आणि स्वस्त सेवेचा वापर करत आहेत. त्याचाच सर्वाधिक परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणत्याही प्रकारचा विचार न करता बहुतांश मार्गांवरील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केल्यामुळेच आगाराचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे.काही अधिकारी वेगवेगळे प्रयोग करून आगाराचे उत्पन्न वाढवण्याऐवजी ते कमी करण्यासाठीच हा निर्णय घेत आहेत की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळे राजापूर आगाराची स्थिती ‘नाकापेक्षा मोती जड’ अशीच झाली आहे. त्यामुळे मनमानी करणाऱ्या अधिकारी व त्यांच्याभोवती फिरणाऱ्या कंपूवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.