शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाने आगार तोट्यात

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे

विनोद पवार - राजापूर -गेल्या काही महिन्यांपासून राजापूर एस. टी. आगारातील अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणताही विचार न करता तालुक्यातील अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये अचानक बदल करण्यात येतो. त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. राजापूर एस. टी. आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे वळता दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगारातील अधिकाऱ्यांनी अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केले. त्यामुळे प्रवासी एस. टी. बसने प्रवास करणे टाळत आहेत. राजापूर आगारातून सुटणारी राजापूर-हातदे गाडी अचानकपणे कोंड्येपर्यंत नेण्यात आल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, शिवाय वेळेचाही अपव्यय होत आहे.समाजात आपली पाठ थोपटली जावी, यासाठीच एखाद-दुसऱ्याने गाडीची मागणी केली तर येथील अधिकारी ती मागणी पूर्ण करतात, असा आरोप आता वाहक-चालकांमधूनच करण्यात येत आहे. मात्र, ती मागणी पूर्ण करताना कोणत्याही प्रकारे भारमानाचा विचार करण्यात येत नसल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राजापूर आगारातील अनेक गाड्या फक्त डिझेल जाळण्याचेच काम करत आहेत. नव्याने उपलब्ध करून दिलेल्या मार्गावर किती भारमान आहे, याचा विचार केला जात नाही. वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे प्रवासीदेखील खासगी आणि स्वस्त सेवेचा वापर करत आहेत. त्याचाच सर्वाधिक परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणत्याही प्रकारचा विचार न करता बहुतांश मार्गांवरील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केल्यामुळेच आगाराचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे.काही अधिकारी वेगवेगळे प्रयोग करून आगाराचे उत्पन्न वाढवण्याऐवजी ते कमी करण्यासाठीच हा निर्णय घेत आहेत की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळे राजापूर आगाराची स्थिती ‘नाकापेक्षा मोती जड’ अशीच झाली आहे. त्यामुळे मनमानी करणाऱ्या अधिकारी व त्यांच्याभोवती फिरणाऱ्या कंपूवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.