शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पाचलच्या आठवडा बाजारात काजू उत्पादकांची लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

पाचल : भात शेतीला पर्याय म्हणून काजू शेतीवर भर देणारे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून काजूला दर मिळत नसल्याने ...

पाचल : भात शेतीला पर्याय म्हणून काजू शेतीवर भर देणारे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून काजूला दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाचल येथील आठवडा बाजारात स्थानिक दलाल काजू उत्पादक शेतकऱ्यांची लूटमार करीत असून, शेतकऱ्यांचा काजू कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला तालुका खरेदी-विक्री संघ याबाबत मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

मागील आठवडा बाजारात सुरुवातीला १२० रुपये प्रती किलाे दराने व्यापाऱ्यांनी काजू खरेदी केला. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा काजू बाजारात आल्याने १२० रुपये खरेदीचा काजू व्यापाऱ्यांनी ८० रुपये प्रती किलाे दराने खरेदी केला. व्यापारी व दलाल ठरवून काजू दर पाडत आहेत. दलाल व व्यापाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नसल्याने, दलाल ठरवतील त्या दराने काजू शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला तालुका खरेदी-विक्री संघ बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी, लाेकप्रतिनिधींनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना जर हमीभाव बांधून दिला असता, तर काजू उत्पादक शेतकऱ्यांवर आज ही परिस्थिती आली नसती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान, अतिवृष्टी, वाढती मजुरी या साऱ्या बाबींचा विचार करता, शेतकऱ्यांच्या काजू उत्पादनाला किमान १५० रुपये प्रती किलाे दर मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.