शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लोकमंच - जंगलातलं शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. ...

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. इतकी वृक्षवल्लींची जत्रा असूनही माणसाचं अनादी एकटेपण रानात गेल्यावरच लक्षात येतं. आपण कुणीही नाही आणि क्षयभंगूर प्रसिद्धीची जी जळपटू आपण जोपासली त्यातही तथ्य नाही हे सत्य रानीवनी लक्षात येतं. अरण्यासारखी दुसरी पाळशाळा नाही. कोल्ह्यांना तुम्ही बालकथेत लबाड म्हणता, पण तोही कुटुंबवत्सल आहे. खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकड्याला शेपटीवर घेणारा आणि नंतर आपटून धोपटून मारणारा कोल्होबा जोखीम घेत असतो.

मी परवाच एका प्रामाणिक, सज्जन शिक्षकाला बोरकर सरांना म्हटलं, मुलांना फार पंखाखाली घेऊच नये. मुलांना रिस्क घ्यायला शिकवलं पाहिजे. नोकऱ्या आहेत कुठे? कर्जाची जबाबदारी घेऊन तरुणांना आता बिझनेस थाटावा लागेल. तोही असा असावा की साथीच्या रोगात सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवता येईल. रफटफ पोरेच यापुढच्या चक्रमचक्री काळात टिकाव धरतील. जे जे दुर्बल आहेत ते काळचक्रात नाहीसे होईल! मृत्यूनंतर जीवन नाही!

आत्मा हे केवळ मनाचं समाधान आहे. स्वर्ग, नरक नावाच्या जागा आकाश-अवकाशात कुठेही नाहीत. हे ज्याला विज्ञान खऱ्या अर्थाने कळतं तो सहज सांगू शकेल! बनावट थाट असणाऱ्या विद्वानांपासून विदुषीपासून मी नेहमीच दूर राहतो. ज्ञानी माणसाची संगत चांगली. काही अस्सल विज्ञानवादी अभ्यासक कोकणात आहेत. ते कॅमेऱ्यासमोर नसतात; पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो.

शहरात, सोसायट्यांमध्येही स्वार्थाचं द्वेषमत्सराचं जंगल आहेच.

ड्रग्ज, दारू आणि तंबाखूने समाज पूर्ण पोखरलेला आहे. ओव्हरस्मार्ट फोनशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. हे व्यसनच आहे. व्यसनांच्या जाळ्यातून तुम्ही मुलाबाळांना बाहेर काढणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी खऱ्या अरण्याकडे निसर्गसृष्टीकडे जावं लागेल. शेतीभातीत, मातीत लक्ष घालावं लागेल. शेतकरी जगवावा लागेल, तरच आपण जगू! जगणं हेच सर्वांत महत्त्वाचं आहे. आजचा अरण्यबोध इतकाच आहे!

माधव गवाणकर, दापाेली.