शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

लोकमंच - जंगलातलं शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. ...

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. इतकी वृक्षवल्लींची जत्रा असूनही माणसाचं अनादी एकटेपण रानात गेल्यावरच लक्षात येतं. आपण कुणीही नाही आणि क्षयभंगूर प्रसिद्धीची जी जळपटू आपण जोपासली त्यातही तथ्य नाही हे सत्य रानीवनी लक्षात येतं. अरण्यासारखी दुसरी पाळशाळा नाही. कोल्ह्यांना तुम्ही बालकथेत लबाड म्हणता, पण तोही कुटुंबवत्सल आहे. खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकड्याला शेपटीवर घेणारा आणि नंतर आपटून धोपटून मारणारा कोल्होबा जोखीम घेत असतो.

मी परवाच एका प्रामाणिक, सज्जन शिक्षकाला बोरकर सरांना म्हटलं, मुलांना फार पंखाखाली घेऊच नये. मुलांना रिस्क घ्यायला शिकवलं पाहिजे. नोकऱ्या आहेत कुठे? कर्जाची जबाबदारी घेऊन तरुणांना आता बिझनेस थाटावा लागेल. तोही असा असावा की साथीच्या रोगात सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवता येईल. रफटफ पोरेच यापुढच्या चक्रमचक्री काळात टिकाव धरतील. जे जे दुर्बल आहेत ते काळचक्रात नाहीसे होईल! मृत्यूनंतर जीवन नाही!

आत्मा हे केवळ मनाचं समाधान आहे. स्वर्ग, नरक नावाच्या जागा आकाश-अवकाशात कुठेही नाहीत. हे ज्याला विज्ञान खऱ्या अर्थाने कळतं तो सहज सांगू शकेल! बनावट थाट असणाऱ्या विद्वानांपासून विदुषीपासून मी नेहमीच दूर राहतो. ज्ञानी माणसाची संगत चांगली. काही अस्सल विज्ञानवादी अभ्यासक कोकणात आहेत. ते कॅमेऱ्यासमोर नसतात; पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो.

शहरात, सोसायट्यांमध्येही स्वार्थाचं द्वेषमत्सराचं जंगल आहेच.

ड्रग्ज, दारू आणि तंबाखूने समाज पूर्ण पोखरलेला आहे. ओव्हरस्मार्ट फोनशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. हे व्यसनच आहे. व्यसनांच्या जाळ्यातून तुम्ही मुलाबाळांना बाहेर काढणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी खऱ्या अरण्याकडे निसर्गसृष्टीकडे जावं लागेल. शेतीभातीत, मातीत लक्ष घालावं लागेल. शेतकरी जगवावा लागेल, तरच आपण जगू! जगणं हेच सर्वांत महत्त्वाचं आहे. आजचा अरण्यबोध इतकाच आहे!

माधव गवाणकर, दापाेली.