शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

लोकमंच - जंगलातलं शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. ...

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. इतकी वृक्षवल्लींची जत्रा असूनही माणसाचं अनादी एकटेपण रानात गेल्यावरच लक्षात येतं. आपण कुणीही नाही आणि क्षयभंगूर प्रसिद्धीची जी जळपटू आपण जोपासली त्यातही तथ्य नाही हे सत्य रानीवनी लक्षात येतं. अरण्यासारखी दुसरी पाळशाळा नाही. कोल्ह्यांना तुम्ही बालकथेत लबाड म्हणता, पण तोही कुटुंबवत्सल आहे. खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकड्याला शेपटीवर घेणारा आणि नंतर आपटून धोपटून मारणारा कोल्होबा जोखीम घेत असतो.

मी परवाच एका प्रामाणिक, सज्जन शिक्षकाला बोरकर सरांना म्हटलं, मुलांना फार पंखाखाली घेऊच नये. मुलांना रिस्क घ्यायला शिकवलं पाहिजे. नोकऱ्या आहेत कुठे? कर्जाची जबाबदारी घेऊन तरुणांना आता बिझनेस थाटावा लागेल. तोही असा असावा की साथीच्या रोगात सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवता येईल. रफटफ पोरेच यापुढच्या चक्रमचक्री काळात टिकाव धरतील. जे जे दुर्बल आहेत ते काळचक्रात नाहीसे होईल! मृत्यूनंतर जीवन नाही!

आत्मा हे केवळ मनाचं समाधान आहे. स्वर्ग, नरक नावाच्या जागा आकाश-अवकाशात कुठेही नाहीत. हे ज्याला विज्ञान खऱ्या अर्थाने कळतं तो सहज सांगू शकेल! बनावट थाट असणाऱ्या विद्वानांपासून विदुषीपासून मी नेहमीच दूर राहतो. ज्ञानी माणसाची संगत चांगली. काही अस्सल विज्ञानवादी अभ्यासक कोकणात आहेत. ते कॅमेऱ्यासमोर नसतात; पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो.

शहरात, सोसायट्यांमध्येही स्वार्थाचं द्वेषमत्सराचं जंगल आहेच.

ड्रग्ज, दारू आणि तंबाखूने समाज पूर्ण पोखरलेला आहे. ओव्हरस्मार्ट फोनशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. हे व्यसनच आहे. व्यसनांच्या जाळ्यातून तुम्ही मुलाबाळांना बाहेर काढणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी खऱ्या अरण्याकडे निसर्गसृष्टीकडे जावं लागेल. शेतीभातीत, मातीत लक्ष घालावं लागेल. शेतकरी जगवावा लागेल, तरच आपण जगू! जगणं हेच सर्वांत महत्त्वाचं आहे. आजचा अरण्यबोध इतकाच आहे!

माधव गवाणकर, दापाेली.