शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

लोकमंच - जंगलातलं शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. ...

एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. इतकी वृक्षवल्लींची जत्रा असूनही माणसाचं अनादी एकटेपण रानात गेल्यावरच लक्षात येतं. आपण कुणीही नाही आणि क्षयभंगूर प्रसिद्धीची जी जळपटू आपण जोपासली त्यातही तथ्य नाही हे सत्य रानीवनी लक्षात येतं. अरण्यासारखी दुसरी पाळशाळा नाही. कोल्ह्यांना तुम्ही बालकथेत लबाड म्हणता, पण तोही कुटुंबवत्सल आहे. खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकड्याला शेपटीवर घेणारा आणि नंतर आपटून धोपटून मारणारा कोल्होबा जोखीम घेत असतो.

मी परवाच एका प्रामाणिक, सज्जन शिक्षकाला बोरकर सरांना म्हटलं, मुलांना फार पंखाखाली घेऊच नये. मुलांना रिस्क घ्यायला शिकवलं पाहिजे. नोकऱ्या आहेत कुठे? कर्जाची जबाबदारी घेऊन तरुणांना आता बिझनेस थाटावा लागेल. तोही असा असावा की साथीच्या रोगात सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवता येईल. रफटफ पोरेच यापुढच्या चक्रमचक्री काळात टिकाव धरतील. जे जे दुर्बल आहेत ते काळचक्रात नाहीसे होईल! मृत्यूनंतर जीवन नाही!

आत्मा हे केवळ मनाचं समाधान आहे. स्वर्ग, नरक नावाच्या जागा आकाश-अवकाशात कुठेही नाहीत. हे ज्याला विज्ञान खऱ्या अर्थाने कळतं तो सहज सांगू शकेल! बनावट थाट असणाऱ्या विद्वानांपासून विदुषीपासून मी नेहमीच दूर राहतो. ज्ञानी माणसाची संगत चांगली. काही अस्सल विज्ञानवादी अभ्यासक कोकणात आहेत. ते कॅमेऱ्यासमोर नसतात; पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो.

शहरात, सोसायट्यांमध्येही स्वार्थाचं द्वेषमत्सराचं जंगल आहेच.

ड्रग्ज, दारू आणि तंबाखूने समाज पूर्ण पोखरलेला आहे. ओव्हरस्मार्ट फोनशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. हे व्यसनच आहे. व्यसनांच्या जाळ्यातून तुम्ही मुलाबाळांना बाहेर काढणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी खऱ्या अरण्याकडे निसर्गसृष्टीकडे जावं लागेल. शेतीभातीत, मातीत लक्ष घालावं लागेल. शेतकरी जगवावा लागेल, तरच आपण जगू! जगणं हेच सर्वांत महत्त्वाचं आहे. आजचा अरण्यबोध इतकाच आहे!

माधव गवाणकर, दापाेली.