शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:55 IST

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : दोन विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा

प्रकाश वराडकर । 

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांसाठी निसटते मताधिक्य देणारे ठरू शकते, असा राजकीय अंदाज आहे. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे सेनेचे विनायक राऊत व तत्कालिन कॉँग्रेस उमेदवार आणि  या निवडणुकीतील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आमने -सामने उभे ठाकले आहेत. तसेच कॉँगे्रस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित आघाडीचे मारूती काका जोशी व बहुजन समाज पार्टीचे सुरेश वरक हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, यावेळी खरी लढत ही शिवसेनेचे विनायक राऊत व स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच आहे. सध्यस्थितीत तरी कॉँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर हे तिसºया क्रमांकावर आहेत.

या निवडणुकीत विनायक राऊत व नीलेश राणे अर्थात शिवसेना व नारायण राणे यांच्यात प्रतिष्ठेचा सामना होत आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र, गेल्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत यांनी विक्रमी ३९ हजार ३२७ एवढे मताधिक्य मिळवले होते. उदय सामंत यांना ९३,४३६ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बाळ माने यांना ५४,१४८ मते मिळाली होती. 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून ७० ते ८० टक्के कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश केला. आधीच रत्नागिरीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली सेना बळकट होतीच. त्यात राष्टÑवादीतील कार्यकर्त्यांमुळे या मतदारसंघात सेनेला दुप्पट बळ मिळाले. या लोकसभा निवडणुकीत  सेना-भाजप युतीमुळे राऊत यांना भाजपचेही बळ मिळणार आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्य हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मिळेल, अशी अटकळ आहे.

त्याचवेळी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे (सध्या स्वाभिमान पक्ष) यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात २५,९७९ एवढे मताधिक्य मिळाले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल राजकीय स्थिती असतानाही नितेश राणे यांनी मिळविलेले २५ हजारचे मताधिक्य हे विरोधकांसाठी त्यावेळी विक्रमीच होते. जसा रत्नागिरी मतदारसंघ सेनेचे आमदार उदय सामंत यांनी पिंजून काढला आहे, आपले राजकीय वर्चस्व स्थापित केले आहे तसेच कणकवली मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांच्या काळात आमदार नितेश राणे यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली मतदारसंघात त्यांचा संपर्क व काम करण्याची पध्दत पाहता गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग