शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:55 IST

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : दोन विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा

प्रकाश वराडकर । 

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांसाठी निसटते मताधिक्य देणारे ठरू शकते, असा राजकीय अंदाज आहे. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे सेनेचे विनायक राऊत व तत्कालिन कॉँग्रेस उमेदवार आणि  या निवडणुकीतील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आमने -सामने उभे ठाकले आहेत. तसेच कॉँगे्रस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित आघाडीचे मारूती काका जोशी व बहुजन समाज पार्टीचे सुरेश वरक हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, यावेळी खरी लढत ही शिवसेनेचे विनायक राऊत व स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच आहे. सध्यस्थितीत तरी कॉँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर हे तिसºया क्रमांकावर आहेत.

या निवडणुकीत विनायक राऊत व नीलेश राणे अर्थात शिवसेना व नारायण राणे यांच्यात प्रतिष्ठेचा सामना होत आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र, गेल्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत यांनी विक्रमी ३९ हजार ३२७ एवढे मताधिक्य मिळवले होते. उदय सामंत यांना ९३,४३६ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बाळ माने यांना ५४,१४८ मते मिळाली होती. 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून ७० ते ८० टक्के कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश केला. आधीच रत्नागिरीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली सेना बळकट होतीच. त्यात राष्टÑवादीतील कार्यकर्त्यांमुळे या मतदारसंघात सेनेला दुप्पट बळ मिळाले. या लोकसभा निवडणुकीत  सेना-भाजप युतीमुळे राऊत यांना भाजपचेही बळ मिळणार आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्य हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मिळेल, अशी अटकळ आहे.

त्याचवेळी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे (सध्या स्वाभिमान पक्ष) यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात २५,९७९ एवढे मताधिक्य मिळाले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल राजकीय स्थिती असतानाही नितेश राणे यांनी मिळविलेले २५ हजारचे मताधिक्य हे विरोधकांसाठी त्यावेळी विक्रमीच होते. जसा रत्नागिरी मतदारसंघ सेनेचे आमदार उदय सामंत यांनी पिंजून काढला आहे, आपले राजकीय वर्चस्व स्थापित केले आहे तसेच कणकवली मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांच्या काळात आमदार नितेश राणे यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली मतदारसंघात त्यांचा संपर्क व काम करण्याची पध्दत पाहता गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग