शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:55 IST

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : दोन विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा

प्रकाश वराडकर । 

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांसाठी निसटते मताधिक्य देणारे ठरू शकते, असा राजकीय अंदाज आहे. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे सेनेचे विनायक राऊत व तत्कालिन कॉँग्रेस उमेदवार आणि  या निवडणुकीतील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आमने -सामने उभे ठाकले आहेत. तसेच कॉँगे्रस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित आघाडीचे मारूती काका जोशी व बहुजन समाज पार्टीचे सुरेश वरक हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, यावेळी खरी लढत ही शिवसेनेचे विनायक राऊत व स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच आहे. सध्यस्थितीत तरी कॉँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर हे तिसºया क्रमांकावर आहेत.

या निवडणुकीत विनायक राऊत व नीलेश राणे अर्थात शिवसेना व नारायण राणे यांच्यात प्रतिष्ठेचा सामना होत आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र, गेल्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत यांनी विक्रमी ३९ हजार ३२७ एवढे मताधिक्य मिळवले होते. उदय सामंत यांना ९३,४३६ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बाळ माने यांना ५४,१४८ मते मिळाली होती. 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून ७० ते ८० टक्के कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश केला. आधीच रत्नागिरीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली सेना बळकट होतीच. त्यात राष्टÑवादीतील कार्यकर्त्यांमुळे या मतदारसंघात सेनेला दुप्पट बळ मिळाले. या लोकसभा निवडणुकीत  सेना-भाजप युतीमुळे राऊत यांना भाजपचेही बळ मिळणार आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्य हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मिळेल, अशी अटकळ आहे.

त्याचवेळी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे (सध्या स्वाभिमान पक्ष) यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात २५,९७९ एवढे मताधिक्य मिळाले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल राजकीय स्थिती असतानाही नितेश राणे यांनी मिळविलेले २५ हजारचे मताधिक्य हे विरोधकांसाठी त्यावेळी विक्रमीच होते. जसा रत्नागिरी मतदारसंघ सेनेचे आमदार उदय सामंत यांनी पिंजून काढला आहे, आपले राजकीय वर्चस्व स्थापित केले आहे तसेच कणकवली मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांच्या काळात आमदार नितेश राणे यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली मतदारसंघात त्यांचा संपर्क व काम करण्याची पध्दत पाहता गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग