शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे बड्या नेत्यांची पाठच - प्रचारात रंगत नाही - उध्दव ठाकरे यांचाच एकमेव दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:54 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याची मुदत चार दिवसांवर आली असली तरी अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाकडे बड्या नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेवगळता एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा

ठळक मुद्देस्वाभिमान पक्षाकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याची मुदत चार दिवसांवर आली असली तरी अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाकडे बड्या नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेवगळता एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा किंवा प्रचार दौरा या मतदारसंघात झालेला नाही. त्यामुळे अजूनही प्रचारात रंगत आलेली नाही.

दरवर्षी निवडणुकांचा डामडौल मोठा असतो. राज्यस्तरावरील नेत्यांच्या, स्टार प्रचारकांच्या सभा मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्यामुळे वातावरण ढवळून निघते. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी, विकासाचे मुद्दे यावर तावातावाने चर्चा होतात. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण लक्षात येते. मुळात आचारसंहितेचा खूप मोठा बाऊ झाल्यामुळे प्रचाराचे अनेक प्रकार बाजूलाच पडले आहेत. रिक्षातून, वाहनातून प्रचार केला जात नाही. बॅनर्स लावले जात नाहीत. त्यात गाजावाजा होतील, अशा प्रचार सभाच न झाल्यामुळे यावेळेच्या निवडणुकांमध्ये रंगतच आलेली नाही.

विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गुरूवारी या मतदार संघात प्रचार दौरा करणार आहेत. सकाळी ११.३0 वाजता देवरूख येथे आणि सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्गात त्यांची जाहीर सभा आहे. मात्र, उध्दव ठाकरेवगळता अन्य कोणत्याही राज्यस्तरीय नेत्याची सभा या मतदार संघात झालेली नाही. २३ एप्रिलला मतदान होणार असल्याने २१ एप्रिल रोजी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होईल. मात्र, पुढच्या तीन दिवसातही बड्या नेत्यांच्या सभांचे नियोजन नाही.

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरी मतदार संघात सभा होणार असल्याची चर्चा खूप आधीपासून सुरू होती. उध्दव ठाकरे यांच्यासोबतच तेही प्रचारासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र, त्यांनी या मतदार संघाकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी सभेला येण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांच्या सभांचे नियोजन काटेकोर असल्यामुळे त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी वेळ देता आलेला नाही. भाजपकडून सुरेश प्रभू यांचाही प्रचार दौरा होणार असल्याची शक्यता होती. मात्र, त्यांच्याही तारखांबाबत समन्वय होत नसल्याने हा दौराही होण्याची शक्यता नाही.

रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग असलेल्या आणि रायगड मतदार संघात समाविष्ट असलेल्या खेडचे पर्यावरणमंत्री रामदास कदम शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. मात्र, त्यांचीही सभा रत्नागिरी मतदार संघात झालेली नाही. शिवसेनेकडे विद्यमान खासदारकी आहे, पाच आमदार आहेत, त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेकडे स्वत:ची अशी यंत्रणा आहे. काँग्रेसकडे विधान परिषद सदस्यवगळता खासदारकीपासून ग्रामपंचायतीपर्यंत काहीच नाही. तरीही काँग्रेसने या मतदार संघात एकही प्रचार सभा लावलेली नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा होतील, असे याआधी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या सभांचे अजून कोणतेच नियोजन नाही. आपण प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना एक सभा घेण्याचे निमंत्रण दिले असल्याचे बांदिवडेकर यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची सभा झालेली नाही.

शिवसेनेचा बालेकिल्ला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहेत. त्यामुळेच इतर पक्षांनी या मतदार संघाकडे दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे. बालेकिल्ला असूनही उध्दव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे. इतर पक्षांनी आपल्या सभांकडे दुर्लक्ष केले आहे. स्वाभिमान पक्षाकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. अर्थात त्याखेरीज कोणीही बडे नेते या मतदार संघात आलेले नाहीत.

शेजारी आले, पण...

हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदार संघाकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेकजण काँग्रेसची साथ सोडून स्वाभिमानच्या वळचणीला गेले असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार लगतच्या गुहागर मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी येऊन गेले. मात्र, त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची बैठकही घेतली नाही किंवा ते इकडे फिरकलेही नाहीत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग