शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Lok Sabha Election 2019 : सूर्यकांत दळवींची डीएनए टेस्ट करा : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 16:30 IST

सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देदळवींची डीएनए टेस्ट करा : रामदास कदमते राजकारण वेगवेगळे : रोहिणी दळवी

दापोली  : सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, सूर्यकांत दळवी यांनी गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपाचा प््राचार केला. यानंतर त्यांनी तटकरे यांना त्यांच्या घराचे दरवाजे खुले केले. अनेक जाहिर कार्यक्रमात त्यांना ज्यांनी पाडले, त्या आमदार संजय कदम यांच्या सोबत असतात.

यामुळे आता सूर्यकांत दळवी हा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांना आम्ही यापुढे अधिक किंमत देणार नाही. आता कुंकू कुणाचे लावायचे, मंगळसूत्र कुणाचे घालायचे व साडी कुणाची नेसायची हे त्यांनी ठरवावे, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी यावेळी केली.मधुकर दळवी म्हणाले की, दुसऱ्या पक्षात गेलेल्या व पुन्हा शिवसेनेत आलेल्या मुंग्यांची आता वारूळे झाली आहेत. या मुंग्या आता एखादा गांडूळ वारूळाकडे कधी येतोय व आपण त्याला कधी फस्त करतोय, याची वाट पहात आहेत. मधुकर दळवी हे आपले सख्खे नातेवाईक नाहीत.

शिवाय पक्षात वेळवीतील एक मुंगी जरी आली, तरी रामदास कदम तिचे स्वागतच करतील, अशी प्रतिक्रिया मधुकर दळवी यांच्या शिवसेना पक्षपुनर्प्रवेशावर माजी आमदार व मधुकर दळवी यांचे भाऊ सूर्यकांत दळवी यांनी दिली होती, यावर ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, राजकारणात माणूस अधोगतीकडे निघाला की त्याला नात्यांचा विसर पडतो. मी तर पुन्हा स्वगृही परत आलेलो आहे. यामुळे पक्षातील अनेक जेष्ठांना आनंद झाला आहे. सूर्यकांत दळवी यांना मात्र मी पक्षात आल्यावर नात्यांचा देखील विसर पडला आहे.ते राजकारण वेगवेगळे : रोहिणी दळवीमधुकर दळवी यांच्यामुळे मी राजकारणात आले, तो विषय फार वेगळा होता. माझ्या सासऱ्यांंनी माझ्या विजयाचा विषय प्रतिष्ठेचा बनवला व त्यामुळे मी निवडून आले. आता सूर्यकांत दळवी यांना मी त्यांची वहिनी नसल्याचा साक्षात्कार झाला आहे. ते आमचे यापुर्वी कुटुंबप्रमुख होते, आज देखील आहेत व उद्या सुध्दा रहातील. राजकारण हे काही वर्षांचे असते. नाती मात्र अनंत काळाची असतात. यामुळे ते जरी नाते विसरले असले तरी आम्ही मात्र आमची नाती विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहिणी दळवी यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गRamdas Kadamरामदास कदम