शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महामार्गावर अवजड वाहनांचे ओझे...

By admin | Updated: April 6, 2015 01:31 IST

पोलिसांची दमछाक : घाटातील अवघड वळणे, उतारांचे आव्हान

फुणगूस : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेल्या अवजड वाहनांच्या रहदारीने वाहतूकीची कोंडी होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक पोलीसांचीही धावपळ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर होवू घातलेले अनेक कारखाने, प्रकल्प, नवनवीन उद्योगधंदे आदींसाठी लागणारे अवजड यांत्रिकी साहित्य वाहतूक करण्यासाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचा वापर होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वाहतूक वाढली आहे. याखेरीज वाळू, खडी, चीरा, तसेच मासळीची वाहतूक करणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, मोठमोठे कंटेनर वाहून नेणाऱ्या इतर गाड्या यांची वाहतूक नित्याची झाली आहे. याहीपेक्षा धोकादायक म्हणजे तीस चाळीस चाकांच्या गाड्याही या मार्गावरुन धाऊ लागल्या आहेत. काहीवेळा या अवजड वाहनावर एवढे अवाढव्य सामान असते की त्यामुळे महामार्गावरील टेलिफोन तारा, झाडांच्या फांद्या तुटून पडतात. अरुंद मोऱ्या आणि वेड्यावाकड्या वळणांमुळे घाटरस्त्यामुळे या अवजड वाहनांसाठी डोकेदुखी ठरला आहे. घाटातून प्रवास करताना मोठ्या वळणात ही वाहने गेल्याशिवाय दोन्ही बाजूच्या वाहनांना जागा मिळणे दुरापास्त होते. महामार्गावरील बहुतेक सगळ्या ब्रिटीशकालीन पुलावरही अशीच स्थिती असते. कधी कधी अरुंद पुलांच्या मध्यावर असे अवजड वाहने बंद पडल्यास दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळते आहे. संगमेश्वरच्या शास्त्री आणि सोनवी पुलावर अशी स्थितीही नेहमीच पहायला मिळत आहे. कामथे, निवळी घाटातील उतारावर, अशा अवजड वाहनांचे अपघात कायम घडतात. ही वाहने घाटातून प्रवास करीत असताना त्यांचा वेग अतिशय संथ असतो. परिणामी त्यांना ओव्हरटेक करणाऱ्या आणि समोरच्या वाहनांना नेहमीच अपघात घडतात. या सर्व प्रकारात वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. अपघात घडल्यास अशा अवजड वाहनांना बाजूला करुन वाहतूक झाली असल्यास ती सोडवण्यासाठी पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. जोपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही, तोपर्यंत पोलिसांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. (वार्ताहर)