शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

महामार्गावर अवजड वाहनांचे ओझे...

By admin | Updated: April 6, 2015 01:31 IST

पोलिसांची दमछाक : घाटातील अवघड वळणे, उतारांचे आव्हान

फुणगूस : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेल्या अवजड वाहनांच्या रहदारीने वाहतूकीची कोंडी होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक पोलीसांचीही धावपळ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर होवू घातलेले अनेक कारखाने, प्रकल्प, नवनवीन उद्योगधंदे आदींसाठी लागणारे अवजड यांत्रिकी साहित्य वाहतूक करण्यासाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचा वापर होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वाहतूक वाढली आहे. याखेरीज वाळू, खडी, चीरा, तसेच मासळीची वाहतूक करणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, मोठमोठे कंटेनर वाहून नेणाऱ्या इतर गाड्या यांची वाहतूक नित्याची झाली आहे. याहीपेक्षा धोकादायक म्हणजे तीस चाळीस चाकांच्या गाड्याही या मार्गावरुन धाऊ लागल्या आहेत. काहीवेळा या अवजड वाहनावर एवढे अवाढव्य सामान असते की त्यामुळे महामार्गावरील टेलिफोन तारा, झाडांच्या फांद्या तुटून पडतात. अरुंद मोऱ्या आणि वेड्यावाकड्या वळणांमुळे घाटरस्त्यामुळे या अवजड वाहनांसाठी डोकेदुखी ठरला आहे. घाटातून प्रवास करताना मोठ्या वळणात ही वाहने गेल्याशिवाय दोन्ही बाजूच्या वाहनांना जागा मिळणे दुरापास्त होते. महामार्गावरील बहुतेक सगळ्या ब्रिटीशकालीन पुलावरही अशीच स्थिती असते. कधी कधी अरुंद पुलांच्या मध्यावर असे अवजड वाहने बंद पडल्यास दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळते आहे. संगमेश्वरच्या शास्त्री आणि सोनवी पुलावर अशी स्थितीही नेहमीच पहायला मिळत आहे. कामथे, निवळी घाटातील उतारावर, अशा अवजड वाहनांचे अपघात कायम घडतात. ही वाहने घाटातून प्रवास करीत असताना त्यांचा वेग अतिशय संथ असतो. परिणामी त्यांना ओव्हरटेक करणाऱ्या आणि समोरच्या वाहनांना नेहमीच अपघात घडतात. या सर्व प्रकारात वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. अपघात घडल्यास अशा अवजड वाहनांना बाजूला करुन वाहतूक झाली असल्यास ती सोडवण्यासाठी पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. जोपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही, तोपर्यंत पोलिसांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. (वार्ताहर)