शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

कोकण रेल्वे ट्रॅकला भाविकांचा भार

By admin | Updated: September 16, 2015 00:48 IST

प्रवाशांची गैरसोय : संथ झालेल्या गाड्यांमुळे भाविकांचे हाल

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची संख्या वाढली आहे. मुंबईकरांसाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या. परंतु, या गाड्या गेले दोन दिवस अर्धा ते पाच, सहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अवघ्या कोकणवासीयांचा गणेशोत्सव हा लाडका सण आहे. या काळात असंख्य भाविक मिळेल त्या वाहनाने कोकणात येत असतात. यावर्षी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या. शिवाय एस. टी. बसेस, खासगी गाड्यांचीही संख्या मोठी आहे. कोकण रेल्वेला गणेशभक्तांची अधिक पसंती असल्याने कोकण रेल्वे महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या आहेत. सीएसटी - मडगाव गणपती स्पेशल ही गाडी दीड तास उशिरा धावत आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिराने धावत आहे. दादर- सावंतवाडी एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिरा धावत आहे. गरीबरथ २ तास उशिराने धावत आहे. मंगला एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे उशिरा धावत आहे. मत्स्यगंधा १ तास २० मिनिटे उशिरा धावत आहे. भावनगर कोचिवली २ तास १५ मिनिटे उशिरा धावत आहे. मडगाव - सावंतवाडी पॅसेंजर १ तास २० मिनिटे उशिरा धावत आहे. सावंतवाडी - दादर गणपती स्पेशल २ तास उशिरा, तर मंगलोर - सीएसटी ६ तास उशिरा धावत आहे. रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने चिपळूण रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्रवाशांचे, लहान मुलांचे हाल झाले आहेत. त्यांना प्यायला पाणी किंवा खायला अन्न मिळणे अवघड झाले होते. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. (प्रतिनिधी)