शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कृ षिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By admin | Updated: August 24, 2015 23:26 IST

ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा : महावितरणच्या समस्या प्रलंबित

रत्नागिरी : महावितरणकडून ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात गेली चार वर्षे कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या असून, आजच्या घडीला ११०० शेतकरी कृषिपंपांची प्रतीक्षा करीत आहेत. निविदा वेळेत काढली जात नसल्याने ही समस्या ओढवली आहे. महावितरणकडून यावर्षी जिल्ह्यात ३५ सौर कृषिपंप वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. रत्नागिरीत येणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे. महावितरण कंपनीकडून ‘कनिष्ठ यंत्रचालक’ व ‘कनिष्ठ तंत्रज्ञ’ पदासाठी २००९ मध्ये सरळसेवा भरतीमध्ये घोटाळा करून चक्क शैक्षणिक अर्हता डावलून पदभरती करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक अर्हता बसत नाही म्हणून सलग तीन वर्षे सेवा झालेल्या उमेदवारांची सेवा खंडित केली. नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सेवा खंडित झालेल्या उमेदवारास मात्र कोकण परिमंडलामध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर रुजू करून घेण्यासाठी मुख्य कार्यालयाकडून दबाव आणण्याचा अजब प्रकार सुरू आहे. महावितरण कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणासाठी विशेष कर्मचारी वर्गनियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच अनेक रिकाम्या जागांवरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती केली जाते. मात्र, त्यांचे वेतन सहा महिन्यांपेक्षा अधिक थकीत राहात असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील हवामान दमट असल्यामुळे वाहिन्या तसेच अन्य उपकरणांना गंज येण्याचे प्रकार अधिक आहे. त्यामुळे कोकणाकरिता देखभाल दुरुस्ती साहित्य वेळेवर व अधिकचे मिळणे गरजेचे आहे; परंतु ते तुटपुंजे मिळत असल्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना उपलब्ध साहित्यामध्ये काम करणे अवघड होत आहे. त्याकरिता भूमिगत वीज वाहिन्यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. २००९ साली रत्नागिरी विभागाचे विभाजन करून लांजा विभाग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. चिपळूण विभागाचे विभाजन करून खेड विभाग करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावेळी चिपळूण विभागाचे विभाजन होऊन खेड विभाग नवीन निर्माण केला गेला; परंतु रत्नागिरी विभागाचे विभाजन मात्र अद्याप रखडले आहे. या संबंधी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आले असून, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा कृषिपंपांच्या जोडण्या त्वरित मिळणे गरजेचे बराच काळ रिक्त राहिलेली पदे भरणे दुरुस्तीसाठी तुटपुंजे साहित्य भरतीमधील गैरव्यवहार नव्या विभागांची निर्मिती