शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कृ षिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By admin | Updated: August 24, 2015 23:26 IST

ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा : महावितरणच्या समस्या प्रलंबित

रत्नागिरी : महावितरणकडून ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात गेली चार वर्षे कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या असून, आजच्या घडीला ११०० शेतकरी कृषिपंपांची प्रतीक्षा करीत आहेत. निविदा वेळेत काढली जात नसल्याने ही समस्या ओढवली आहे. महावितरणकडून यावर्षी जिल्ह्यात ३५ सौर कृषिपंप वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. रत्नागिरीत येणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे. महावितरण कंपनीकडून ‘कनिष्ठ यंत्रचालक’ व ‘कनिष्ठ तंत्रज्ञ’ पदासाठी २००९ मध्ये सरळसेवा भरतीमध्ये घोटाळा करून चक्क शैक्षणिक अर्हता डावलून पदभरती करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक अर्हता बसत नाही म्हणून सलग तीन वर्षे सेवा झालेल्या उमेदवारांची सेवा खंडित केली. नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सेवा खंडित झालेल्या उमेदवारास मात्र कोकण परिमंडलामध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर रुजू करून घेण्यासाठी मुख्य कार्यालयाकडून दबाव आणण्याचा अजब प्रकार सुरू आहे. महावितरण कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणासाठी विशेष कर्मचारी वर्गनियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच अनेक रिकाम्या जागांवरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती केली जाते. मात्र, त्यांचे वेतन सहा महिन्यांपेक्षा अधिक थकीत राहात असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील हवामान दमट असल्यामुळे वाहिन्या तसेच अन्य उपकरणांना गंज येण्याचे प्रकार अधिक आहे. त्यामुळे कोकणाकरिता देखभाल दुरुस्ती साहित्य वेळेवर व अधिकचे मिळणे गरजेचे आहे; परंतु ते तुटपुंजे मिळत असल्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना उपलब्ध साहित्यामध्ये काम करणे अवघड होत आहे. त्याकरिता भूमिगत वीज वाहिन्यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. २००९ साली रत्नागिरी विभागाचे विभाजन करून लांजा विभाग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. चिपळूण विभागाचे विभाजन करून खेड विभाग करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावेळी चिपळूण विभागाचे विभाजन होऊन खेड विभाग नवीन निर्माण केला गेला; परंतु रत्नागिरी विभागाचे विभाजन मात्र अद्याप रखडले आहे. या संबंधी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आले असून, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा कृषिपंपांच्या जोडण्या त्वरित मिळणे गरजेचे बराच काळ रिक्त राहिलेली पदे भरणे दुरुस्तीसाठी तुटपुंजे साहित्य भरतीमधील गैरव्यवहार नव्या विभागांची निर्मिती