शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृ षिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By admin | Updated: August 24, 2015 23:26 IST

ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा : महावितरणच्या समस्या प्रलंबित

रत्नागिरी : महावितरणकडून ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात गेली चार वर्षे कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या असून, आजच्या घडीला ११०० शेतकरी कृषिपंपांची प्रतीक्षा करीत आहेत. निविदा वेळेत काढली जात नसल्याने ही समस्या ओढवली आहे. महावितरणकडून यावर्षी जिल्ह्यात ३५ सौर कृषिपंप वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. रत्नागिरीत येणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे. महावितरण कंपनीकडून ‘कनिष्ठ यंत्रचालक’ व ‘कनिष्ठ तंत्रज्ञ’ पदासाठी २००९ मध्ये सरळसेवा भरतीमध्ये घोटाळा करून चक्क शैक्षणिक अर्हता डावलून पदभरती करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक अर्हता बसत नाही म्हणून सलग तीन वर्षे सेवा झालेल्या उमेदवारांची सेवा खंडित केली. नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सेवा खंडित झालेल्या उमेदवारास मात्र कोकण परिमंडलामध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर रुजू करून घेण्यासाठी मुख्य कार्यालयाकडून दबाव आणण्याचा अजब प्रकार सुरू आहे. महावितरण कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणासाठी विशेष कर्मचारी वर्गनियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच अनेक रिकाम्या जागांवरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती केली जाते. मात्र, त्यांचे वेतन सहा महिन्यांपेक्षा अधिक थकीत राहात असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील हवामान दमट असल्यामुळे वाहिन्या तसेच अन्य उपकरणांना गंज येण्याचे प्रकार अधिक आहे. त्यामुळे कोकणाकरिता देखभाल दुरुस्ती साहित्य वेळेवर व अधिकचे मिळणे गरजेचे आहे; परंतु ते तुटपुंजे मिळत असल्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना उपलब्ध साहित्यामध्ये काम करणे अवघड होत आहे. त्याकरिता भूमिगत वीज वाहिन्यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. २००९ साली रत्नागिरी विभागाचे विभाजन करून लांजा विभाग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. चिपळूण विभागाचे विभाजन करून खेड विभाग करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावेळी चिपळूण विभागाचे विभाजन होऊन खेड विभाग नवीन निर्माण केला गेला; परंतु रत्नागिरी विभागाचे विभाजन मात्र अद्याप रखडले आहे. या संबंधी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आले असून, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा कृषिपंपांच्या जोडण्या त्वरित मिळणे गरजेचे बराच काळ रिक्त राहिलेली पदे भरणे दुरुस्तीसाठी तुटपुंजे साहित्य भरतीमधील गैरव्यवहार नव्या विभागांची निर्मिती