शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

‘जीवन अमृत’ पाझरलेच नाही

By admin | Updated: May 4, 2016 23:54 IST

अल्प प्रतिसाद : रक्ताच्या तत्पर पुरवठ्याचे तीनतेरा

रत्नागिरी : रुग्णांना रक्ताचा तत्पर पुरवठा व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जीवन अमृत’ योजनेला रत्नागिरीतील नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.‘जीवन अमृत’ योजना ही सर्वप्रथम सातारा, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यांनतर ७ जानेवारी २०१४ रोजी संपूर्ण महारष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरूवातीच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रबरोबरच रत्नागिरीतूनही या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला.रुग्णांना तत्पर रक्तांचा पुरवठा व्हावा, म्हणून दोन वर्षापूर्वी ‘जीवन अमृत’ ही योजना सुरू करण्यात आली. ही सेवा महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय संस्था तयार करून ही संस्था रुग्णांपर्यंत पोहचून रक्तपुरवठा करण्याचे काम करते. ही शासकीय सेवा ४० किलोमीटरच्या आत किंवा एक तासांच्या अंतरावरील खासगी रुग्णालयांनाही पुरविण्यात येते. त्यासाठी खासगी रुग्णालयांनी रक्तपेढीची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर टोल फ्री क्रमांक १०४ वर फोन करून गरजेनुसार मागणी करावी लागते. त्यानंतर रक्ताची अद्ययावतरित्या तपासणी करून निव्वळ तासाभरात रुग्णांना रक्तपुरवठा केला जात आहे.या योजनेच्या सुरुवातीला नागरिकांकडूनही प्रतिसाद लाभला. सन २०१५ या कालावधीत सुमारे १९८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. तर या चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलपर्यंत ५५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांनी या सेवेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक हे शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतून रक्त न घेता खासगी रक्तपेढीतून रक्त घेतात. खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्यासाठी खासगी रुग्णालये प्रवृत्त करतात. त्यामुळे सामान्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या ‘जीवन अमृत’ सेवा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. (वार्ताहर)सन २०१५ रोजी १९८ रुग्णांनी घेतला लाभ.गुणवत्तापूर्वक रक्तपुरवठा तरीही नागरिकांची पाठ.१०४ टोल फ्री वर फोन केल्यास तासभरात रक्तपुरवठा.प्रथम सातारा, सिंधुदुर्ग व ठाणे या जिल्ह्यांतच सुरू होती जीवन अमृत योजना.काही खासगी रुग्णालयातून रुग्णांचे नातेवाईक ांना शासकीय रक्तपेढीतून रक्त न घेता खासगी रक्तपेढ्यांतून रक्त घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे या सेवेकडे ते पाठ फिरवत आहेत. रत्नागिरीच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये या सेवेची अवस्था अत्यंत बिकट असल्याची माहिती संबधित सूत्रांनी दिली.लांजा, पालीत सुविधारत्नागिरीमध्ये अमृत जीवन ही सेवा सुरू करण्यात आली असून, लांजा व पाली याठिकाणीही ही सेवा देण्यास प्रारंभ केला जाणार आहे.