शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

महामंडळाचे पत्र दिशाभूल करणारे

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

नवी औद्योगिक वसाहत : जमीन न देण्याच्या भूमिकेवर संघर्ष समिती ठाम

शृंगारतळी : चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील चौदा गावांत होणाऱ्या नियोजित औद्योगिक वसाहतीसंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे़. ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयात येऊन धडकल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, संबंधित पत्र बनावट असून, मागण्यांबाबत कोणतीच बैठक झाली नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीची बैठक घेऊन या प्रकाराबाबत निषेधही करण्यात आला. या पत्रामुळे परिसरातील वातावरण तणावाचे बनले आहे. संघर्ष समितीच्या या बैठकीला चौदा गावांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक चिखली ग्रामपंचायत कार्यालयात झाली. गुहागर व चिपळूण तालुक्यातील चौदा गावांमधील साडेसात हजार एकर जमीन नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केली जाणार आहे. त्याला येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. चौदा गावांच्या जमीनधारकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूने असे प्रकार जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. यामुळे खळबळ माजली आहे. येथील भूसंपादनाबाबत संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शिर्के, डॉ. जगदीश पाटेकर, प्रमोद शिर्के, प्रभाकर शिर्के, मधुकर माने, अशोक भडवळकर, राजाराम मोरे, अजित बेलवलकर, वीरूशेठ मोरे, लतिफ लालू, भगवान कदम आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)