शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर ...

लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर बसून सगळी कामे केली जातात. मंत्रालयातील दालनात ते जातही नाहीत. आज जास्त बोलत नाही. पुढच्यावेळी येऊ, त्यावेळी अधिकचे बोलू आणि टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू. माझा आवाज कोणीच बंद करू शकत नाही. खोटेपणा कराल तर हीच जनता तुम्हाला उत्तर देणार आहे. पुढे या कोकणातून शिवसेनेचा एकही आमदार, खासदार निवडून जाणार नाही, असा आपण निर्धार करुया आणि शिवसेना हद्दपार करुया. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवूया, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लांजा येथे केले.

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शेट्ये पटांगणात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या यात्रेचे स्वागत केले. तालुक्यातील अनेक संस्थांनीही मंत्री राणे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार आशिष शेलार, आमदार नीतेश राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष महेश तथा मुन्ना खामकर, राजश्री विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुका प्रभारी वसंत घडशी, भाई जाधव, प्रसन्न शेट्ये उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री राणे पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दुकानात घुसून दरोडा टाकला जात आहे. राज्यामध्ये महिला, दुकानदार, शेतकरी, कलाकार, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही राहिला आहे. मुख्यमंत्री मातोश्री सोडून बाहेर पडत नाहीत. मंत्रालयाच्या दालनात जात नाहीत. ते सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवणार? ते शिवसैनिकांना भेटायला आले का? त्यांनी एकट्याने शिवसेना वाढवली का? निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात, अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.

आपल्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री पदाचा कोकणात जास्तीत-जास्त उपयोग करणार आहे. तिन्ही जिल्ह्यात उद्योजक तयार झाले पाहिजे. छोटे - छोटे उद्योग तयार झाले की, कोकणात आर्थिक सुबत्ता येईल. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महिला बचत गट व युवकांनी पुढे येऊन त्यांना मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा, असेही आवाहन मंत्री राणे यांनी केले. आमदार आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली.