शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर ...

लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर बसून सगळी कामे केली जातात. मंत्रालयातील दालनात ते जातही नाहीत. आज जास्त बोलत नाही. पुढच्यावेळी येऊ, त्यावेळी अधिकचे बोलू आणि टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू. माझा आवाज कोणीच बंद करू शकत नाही. खोटेपणा कराल तर हीच जनता तुम्हाला उत्तर देणार आहे. पुढे या कोकणातून शिवसेनेचा एकही आमदार, खासदार निवडून जाणार नाही, असा आपण निर्धार करुया आणि शिवसेना हद्दपार करुया. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवूया, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लांजा येथे केले.

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शेट्ये पटांगणात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या यात्रेचे स्वागत केले. तालुक्यातील अनेक संस्थांनीही मंत्री राणे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार आशिष शेलार, आमदार नीतेश राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष महेश तथा मुन्ना खामकर, राजश्री विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुका प्रभारी वसंत घडशी, भाई जाधव, प्रसन्न शेट्ये उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री राणे पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दुकानात घुसून दरोडा टाकला जात आहे. राज्यामध्ये महिला, दुकानदार, शेतकरी, कलाकार, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही राहिला आहे. मुख्यमंत्री मातोश्री सोडून बाहेर पडत नाहीत. मंत्रालयाच्या दालनात जात नाहीत. ते सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवणार? ते शिवसैनिकांना भेटायला आले का? त्यांनी एकट्याने शिवसेना वाढवली का? निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात, अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.

आपल्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री पदाचा कोकणात जास्तीत-जास्त उपयोग करणार आहे. तिन्ही जिल्ह्यात उद्योजक तयार झाले पाहिजे. छोटे - छोटे उद्योग तयार झाले की, कोकणात आर्थिक सुबत्ता येईल. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महिला बचत गट व युवकांनी पुढे येऊन त्यांना मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा, असेही आवाहन मंत्री राणे यांनी केले. आमदार आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली.