शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर ...

लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर बसून सगळी कामे केली जातात. मंत्रालयातील दालनात ते जातही नाहीत. आज जास्त बोलत नाही. पुढच्यावेळी येऊ, त्यावेळी अधिकचे बोलू आणि टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू. माझा आवाज कोणीच बंद करू शकत नाही. खोटेपणा कराल तर हीच जनता तुम्हाला उत्तर देणार आहे. पुढे या कोकणातून शिवसेनेचा एकही आमदार, खासदार निवडून जाणार नाही, असा आपण निर्धार करुया आणि शिवसेना हद्दपार करुया. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवूया, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लांजा येथे केले.

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शेट्ये पटांगणात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या यात्रेचे स्वागत केले. तालुक्यातील अनेक संस्थांनीही मंत्री राणे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार आशिष शेलार, आमदार नीतेश राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष महेश तथा मुन्ना खामकर, राजश्री विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुका प्रभारी वसंत घडशी, भाई जाधव, प्रसन्न शेट्ये उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री राणे पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दुकानात घुसून दरोडा टाकला जात आहे. राज्यामध्ये महिला, दुकानदार, शेतकरी, कलाकार, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही राहिला आहे. मुख्यमंत्री मातोश्री सोडून बाहेर पडत नाहीत. मंत्रालयाच्या दालनात जात नाहीत. ते सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवणार? ते शिवसैनिकांना भेटायला आले का? त्यांनी एकट्याने शिवसेना वाढवली का? निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात, अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.

आपल्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री पदाचा कोकणात जास्तीत-जास्त उपयोग करणार आहे. तिन्ही जिल्ह्यात उद्योजक तयार झाले पाहिजे. छोटे - छोटे उद्योग तयार झाले की, कोकणात आर्थिक सुबत्ता येईल. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महिला बचत गट व युवकांनी पुढे येऊन त्यांना मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा, असेही आवाहन मंत्री राणे यांनी केले. आमदार आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली.